AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुलायमसिंह यादव यांना पुरस्कार हे आक्रितच, मोदी सरकार वीर सावरकर, बाळासाहेब ठाकरे यांना विसरले; ‘सामना’तून हल्ला

बाबरी मशिद पाडली त्यानंतर मुलासमय सिंह यादव यांनी गोळीबार केला नसता तर संतापाचा भडका उडून हिंदू रस्त्यावर उतरला नसता. त्याचा राजकीय फायदा उत्तरेत भाजपला झाला नसता.

मुलायमसिंह यादव यांना पुरस्कार हे आक्रितच, मोदी सरकार वीर सावरकर, बाळासाहेब ठाकरे यांना विसरले; 'सामना'तून हल्ला
veer savarkarImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jan 28, 2023 | 7:34 AM
Share

मुंबई: केंद्र सरकारने समाजवादी पार्टीचे दिवंगत नेते मुलायम सिंह यादव यांना पद्मविभूषण पुरस्कार दिला आहे. त्यावरून दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून केंद्र सरकारवर जोरदार टीका करण्यात आली आहे. ज्या मुलायमसिंह यादव यांनी कारसेवकांना गोळया घालून ठार केलं, ज्या मुलायमसिंह यांना भाजपने ‘मौलाना मुलायम’ म्हणून हिणवलं त्याच मुलायमसिंह यादव यांना पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. मात्र, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे या दोन हिंदुहृदय सम्राटांना पुरस्कार देण्यात आला नाही. त्यांना मोदी सरकार विसरले. सावरकरांना पुरस्कार देण्यापासून मोदी सरकारला कोणी रोखले होते? असा संतप्त सवाल दैनिक सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आला आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी अनेकांना पद्म पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. यातील अनेक नावे संघ परिवाराशी संबंधित आहेत. अर्थात त्याबद्दल आक्षेप घेण्याचे कारण नाही. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या रमेश पतंगे, भिकुजी इदाते यांचा सन्मान योग्यच आहे, असं सामना अग्रलेखातून म्हटलं आहे.

हे आक्रितच म्हणावे लागेल

मुलायमसिंह यादव यांना पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आला. हे आक्रितच म्हणावे लागेल. जिवंतपणी कारसेवकांचे हत्यारे म्हणून त्यांची अवहेलना भाजपने केली. त्यांना मौलाना मुलायम म्हणून हिणवलं. त्याच मुलायमसिंह यादव यांना भाजपने सर्वोच्च नागरी पुरस्कार दिला. प्रखर हिंदुत्ववादी मोदी सरकारने दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मुलायमसिंह यादव यांना दिला, अशी टीका अग्रलेखातून करणअयात आली आहे.

ते ऋण फेडण्यासाठी

बाबरी मशिद पाडली त्यानंतर मुलासमय सिंह यादव यांनी गोळीबार केला नसता तर संतापाचा भडका उडून हिंदू रस्त्यावर उतरला नसता. त्याचा राजकीय फायदा उत्तरेत भाजपला झाला नसता. ते ऋण फेडण्यासाठीच मुलायम सिंग यादव यांना सन्मानित करण्यात आले काय? असा सवाल अग्रलेखातून करण्यात आला आहे.

कोणी रोखले?

बाळासाहेब ठाकरे आणि सावरकर यांना भारतरत्नाने सन्मानित केले जाईल असे वाटत होते. मात्र तसे घडले नाही. सावरकरांच्या अपमानाचे राजकारण करणाऱ्या भाजपाला वीर सावरकरांचा सन्मान करण्यापासून कोणी रोखले आहे? असा सवालही करण्यात आला आहे.

तर ढोंग लपले असते

बाळासाहेबांच्या नावाने दुकान चालविणारे सरकार राज्यात आहे. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचं तैलचित्र लावण्याचा मोठा गाजावाजा केला. पण याच सरकारने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि वीर सावरकर यांच्या नावाची भारतरत्नासाठी शिफारस केली असती तर त्यांचे हे ढोंग लपले गेले असते, असा टोलाही लगावण्यात आला आहे.

Follow Us
कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल..
मोठी बातमी! कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल एक कोटी....
अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं...
Mumbai | अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं इमर्जेन्सी लँडिंग
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले.
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले... नेमकी भानगड काय?
CJP चा सरकारला अल्टिमेटम! FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
CJP On Students Protest | CJP चा सरकारला अल्टिमेटम! उद्यापर्यंत FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या'
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या' पोस्टची तुफान चर्चा
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? मोठा खुलासा
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? तुकाराम मुंडेंसोबतच्या भेटीबाबत रोहित पवारांचा खुलासा
फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका...
Bharat Gogawale | फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं, व्हिडीओ व्हायरल होताच...
संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक
Om Birla | संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक; नेमकी कोणत्या विषयावर चर्चा?