मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या, मागासवर्ग आयोगाची शिफारस

मुंबई : मराठा समाजाला इतर मागास वर्ग अर्थात ओबीसीतून आरक्षण द्या, अशी शिफारस मागासवर्ग आयोगाने केली आहे. आतापर्यंत मराठा समाजाला स्वतंत्रपणे आरक्षण दिले जाणार असल्याची चर्चा होती. मात्र, आता ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्याची शिफारस मागासवर्ग आयोगाने केल्याची माहिती समोर येत आहे. अहवाल आला, आता पुढील प्रक्रिया काय? आरक्षणासाठी समाजिक, आर्थिक मागासलेपण सिद्ध होणं ही प्रमुख […]

मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या, मागासवर्ग आयोगाची शिफारस
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 5:02 PM

मुंबई : मराठा समाजाला इतर मागास वर्ग अर्थात ओबीसीतून आरक्षण द्या, अशी शिफारस मागासवर्ग आयोगाने केली आहे. आतापर्यंत मराठा समाजाला स्वतंत्रपणे आरक्षण दिले जाणार असल्याची चर्चा होती. मात्र, आता ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्याची शिफारस मागासवर्ग आयोगाने केल्याची माहिती समोर येत आहे.

अहवाल आला, आता पुढील प्रक्रिया काय?

आरक्षणासाठी समाजिक, आर्थिक मागासलेपण सिद्ध होणं ही प्रमुख गरज आहे. मागासवर्ग आयोगाने नेमकं तेच तपासून आपला अहवाल सादर केला आहे. हा अहवाल आता सचिवांकडे सोपवला आहे. तो अहवाल राज्य सरकारमार्फत 19 नोव्हेंबरला हायकोर्टात सादर केला जाईल. शिवाय हा अहवाल मंत्रिमंडळासमोर सादर केला जाईल. तिथे तो अहवाल स्वीकारणे/नाकारणे यावर निर्णय होईल. मग राज्य सरकार अधिवेशनात हा अहवाल मांडेल. त्याबाबत सरकार कायदा करु शकतं

हायकोर्टात मराठा आरक्षणाला जे आव्हान देण्यात आलं होतं, ते मागासलेपण सिद्ध झालेलं नसल्यामुळेच करण्यात आलं. हायकोर्ट यावर काय निर्णय देतं यावर सर्व आरक्षणाचं भवितव्य अवलंबून असेल.

आरक्षणासाठी संवाद यात्रा सुरु

मराठा आरक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे सादर झालाय. आता आरक्षणासाठी मराठा समाज अधिक आक्रमक झालाय. आरक्षणाच्या मागणीसाठी आजपासून मराठा संवाद यात्रेला सुरुवात करण्यात आली आहे. पुण्यातील एसएसपीएमएस कॉलेजमधील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून यात्रेला सुरुवात करण्यात आली. आजपासून सुरू होणारी यात्रा 26 तारखेला विधानभवनावर धडकणार आहे.

संवाद यात्रेचा उद्देश काय?

जनसंवाद यात्रेतून मराठा समाजातील प्रत्येक समुहाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम केलं जाणार आहे. आरक्षणासाठी तरुणांच्या आत्महत्या असो, किंवा इतर सामाजिक प्रश्न, सर्व गोष्टींची यातून जाणिव करुन दिली जाणार आहे. त्यामुळे पुणे आणि औरंगाबादमधून ही संवाद यात्रा निघणार आहे.

मुंबईत आझाद मैदानावर उपोषण

मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानावरही बेमुदत उपोषण सुरु आहे. या उपोषणाचा आज 15 वा दिवस असल्यामुळे उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली आहे. उपोषणकर्त्यांनी रुग्णालयात दाखल होण्यासही नकार दिलाय. ओबीसींमधून मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि इतर मागण्याही मान्य व्हाव्यात, यासाठी हे उपोषण सुरु आहे.

संबंधित बातम्या :

मागासवर्ग आयोगाचा अहवाल आला, पुढे काय?  

मराठा आरक्षण : मागासवर्ग आयोगावर 13 कोटी 26 लाखांचा खर्च 

मराठा आरक्षण: उपोषणकर्ते सचिन पाटील यांची प्रकृती बिघडली 

‘त्याच दिवशी’ फडणवीस म्हणाले होते, ‘हे आरक्षण घटनाविरोधी, कोर्टात टिकणार नाही’ 

मराठा आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोगाचा अहवाल सादर

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.