राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेतील 9 महत्त्वाचे मुद्दे

राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराममधील विधानसभा निवडणुकीचा निकाल स्पष्ट झाल्यानंतर राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली. अत्यंत संयमी, सौम्य आणि शांततेत राहुल गांधी यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. काँग्रेस कार्यकर्त्यांवरील विश्वास त्यांनी बोलून दाखवला. राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेतील 9 महत्त्वाचे मुद्दे : मुद्दा क्रमांक – 01 काँग्रेस कार्यकर्ते ‘बब्बर शेर’ आहेत. काँग्रेसच्या […]

राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेतील 9 महत्त्वाचे मुद्दे
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:52 PM

राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराममधील विधानसभा निवडणुकीचा निकाल स्पष्ट झाल्यानंतर राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली. अत्यंत संयमी, सौम्य आणि शांततेत राहुल गांधी यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. काँग्रेस कार्यकर्त्यांवरील विश्वास त्यांनी बोलून दाखवला.

राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेतील 9 महत्त्वाचे मुद्दे :

मुद्दा क्रमांक – 01

काँग्रेस कार्यकर्ते ‘बब्बर शेर’ आहेत. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दाखवून दिलंय की, आम्ही काय आहोत ते! – राहुल गांधी

मुद्दा क्रमांक – 02

राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये आतापर्यंतच्या मुख्यमंत्र्यांनी जे केले, त्यासाठी त्यांचे आभार मानतो. मात्र आता बदल झालाय. आम्ही आणखी काम करु राज्याला पुढे नेऊ – राहुल गांधी

मुद्दा क्रमांक – 03

शेतकरी, युवा, लघुद्योजक इत्यादी सर्वांना जी आश्वासनं दिलीत, ती पूर्ण करु. विशेषत: रोजगार आणि शेतकऱ्यांच्या समस्या, हे आमच्या समोरील सर्वात महत्त्वाचे मुद्दे असतील – राहुल गांधी

मुद्दा क्रमांक – 04

विरोधक एकत्र लढतील, हे निश्चित आहे, आम्ही किती एकजुटीने एकत्र आहोत, हेही तुम्ही पाहिले असालच – राहुल गांधी

मुद्दा क्रमांक – 05

सगळ्या विचारधारांचा मी आदर करतो. आम्ही भाजपच्या विचारधारेविरोधात लढू, त्यांना पराभूत करु. आताही पराभव केलंय, 2019 साली पण पराभव करु.मात्र आम्ही त्यांना देशातून ‘मुक्त’ करणार नाही – राहुल गांधी

मुद्दा क्रमांक – 06

मुख्यमंत्रिपदाच्या नावासाठी कुठेही अडचण नाही, ती प्रक्रिया सहज पूर्ण होईल – राहुल गांधी

मुद्दा क्रमांक – 07

देशाला व्हिजन देण्यात मोदी आणि भाजप पूर्णपणे पराभूत झाले आहेत. देशात परिवर्तन घडवण्याची चार वर्षांपूर्वी मोदींना मोठी संधी होती, मात्र दुर्दैवाने, देशवासियांच्या मनातील गोष्ट त्यांनी ऐकलीच नाही – राहुल गांधी

मुद्दा क्रमांक – 08

मी स्पष्ट सांगू? शेतकऱ्यांच्या समस्यांवरील उपाय खूप कठीण आहेत, मात्र एक नक्की, की आम्ही ते उपाय शोधू आणि अंमलात आणू – राहुल गांधी

मुद्दा क्रमांक – 09

भले काँग्रेस जिंकली असेल, पण ईव्हीएमबाबतची शंका ही कायम आहे, कारण ईव्हीएमबाबत काही मुलभूत प्रश्न आहेत – राहुल गांधी

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.