किसान मुक्ती मोर्चा LIVE : हातात कवटी घेऊन शेतकरी दिल्लीत

दिल्ली: देशभरातील शेतकरी आज पुन्हा एकदा राजधानी दिल्लीत धडकले आहेत. कृषीक्षेत्रावर ओढवलेले आर्थिक संकट आणि शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी संसदेचे 21 दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवण्यात यावे, अशी मागणी करत अखिल भारतीय शेतकरी संघर्ष समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली, महाराष्ट्रासह देशभरातील लाखो शेतकरी राजधानी दिल्लीत पोहोचले आहेत. तब्बल 200 शेतकरी संघटना एकत्र येत, संपूर्ण देशातून पदयात्रा करुन मोठ्या संख्येने शेतकरी दिल्लीत […]

किसान मुक्ती मोर्चा LIVE : हातात कवटी घेऊन शेतकरी दिल्लीत
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:57 PM

दिल्ली: देशभरातील शेतकरी आज पुन्हा एकदा राजधानी दिल्लीत धडकले आहेत. कृषीक्षेत्रावर ओढवलेले आर्थिक संकट आणि शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी संसदेचे 21 दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवण्यात यावे, अशी मागणी करत अखिल भारतीय शेतकरी संघर्ष समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली, महाराष्ट्रासह देशभरातील लाखो शेतकरी राजधानी दिल्लीत पोहोचले आहेत. तब्बल 200 शेतकरी संघटना एकत्र येत, संपूर्ण देशातून पदयात्रा करुन मोठ्या संख्येने शेतकरी दिल्लीत आले आहेत. सध्या हे शेतकरी दिल्ली हरियाणा बॉर्डरवर बिजवासन परिसरात थांबले आहेत. येथून 25 किलोमीटरची पदयात्रा करत रामलीला मैदानात पोहोचणार आहेत. ‘किसान मुक्ती मोर्चा’ असे मोर्चाचे नाव असून यासाठी देशभरातील 200 शेतकरी संघटनांचे शेतकरी आज आणि उद्या दिल्लीत दाखल होणार आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात आंदोलनकर्ते जमा होणार असल्याने, दिल्ली पोलिसांनी मार्गदर्शिका जारी केली आहे. याअंतर्गत जंतर-मंतरवर एक हजारहून अधिक लोक एकत्रित येणे प्रतिबंधित आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची संख्या वाढली तर त्यांना जंतर मंतरवरुन रामलीला मैदानात जाऊन धरणे आंदोलन करावे लागेल.  या आंदोलनासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह 20 पेक्षा अधिक राजकीय पक्षांच्या नेत्यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. तर भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनाही निमंत्रण पाठवलं आहे.

LIVE UPDATE

10 AM –  रामलीला ते संसद मार्ग वरील किसान कर्ज मुक्ती मार्च ला दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारली , खा.राजू शेट्टी यांनी दिल्ली पोलिसांच्या भूमिकेवर उपस्थित केले प्रश्नचिन्ह

शेतकऱ्यांच्या रेल्वेत पाण्याचा थेंब नाही, अधिकारी म्हणतो, रेल्वेसमोर आडवे पडा, पाणी देतो! 

शेतकऱ्यांच्या हातात मृत शेतकऱ्याची कवटी

..तर दिल्लीच्या रस्त्यावर नग्न आंदोलन,  तामिळनाडूच्या शेतकऱ्यांचा सरकारला इशारा, कडाक्याच्या थंडीत शेतकरी अर्धनग्न पोहोचले. मृत शेतकऱ्यांची कवटी हातात घेऊन सरकारचा निषेध.

सुक्या पोळ्या खाऊन आंदोलन

– रामलीला मैदानात सुक्या पोळ्या खाऊन शेतकऱ्यांचं आंदोलन,  मंगळवारी बनवलेल्या पोळ्या आदिवासी शेतकरी तीन दिवसानंतर आज गुरुवारी खात आहेत,  सुक्या पोळ्या खाऊन शेतकऱ्यांचं आपल्या हक्कासाठी आंदोलन

अजित नवले पहाटे दिल्लीत दाखल

– महाराष्ट्र राज्य किसान सभेचे नेते अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली अनेक शेतकरी पहाटे 4 वाजता दिल्ली स्टेशनवर दाखल

– किसान मुक्ती मोर्चासाठी देशभरातील शेतकरी दिल्लीत दाखल व्हायला सुरूवात

– महाराष्ट्रातील आदिवासी आणि शेतकऱ्यांचा एक गट दिल्लीत दाखल झाला

– महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची स्वाभिमानी एक्सप्रेस आज रात्री दिल्लीत दाखल होणार

– देशभरातील 200 शेतकरी संघटनांचे शेतकरी आज सायंकाळपर्यंत दिल्लीत दाखल होणार

– स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ शहरातील लोकंही रस्त्यावर उतरणार

– शरद पवार, राहुल गांधी यांच्यासह 20 पेक्षा जास्त राजकीय पक्षांच्या नेत्यांना मोर्चासाठी निमंत्रण

– भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनाही निमंत्रण

संसदेचे 21 दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवून त्यामध्ये स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी, महाग शिक्षण आणि आरोग्यसेवांमुळे वाढलेला कर्जाचा बोजा, कर्जामुळे शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या, पाण्याच्या खासगीकरणामुळे वाढते जलसंकट, महिला शेतकऱ्यांचे अधिकार, शहरांकडे स्थलांतर करणाऱ्या भूमीहीन शेतमजुरांचे प्रश्न, शेतीचे भविष्य अशा सात विषयांवर संसदेत प्रत्येकी तीन दिवस चर्चा व्हावी, अशी मागणी किसान संघर्ष समन्वय समितीने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे सप्टेंबर महिन्यात एका पत्राद्वारे केली होती. त्याच पार्श्वभूमीवर आज हा शेतकऱ्यांचा मोर्चा द्ल्लीत धडकणार आहे.

शेतकऱ्यांच्या मागण्या काय आहेत?

  • शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी संसदेचे 21 दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवण्यात यावे
  • स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्या
  • शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावं
  • शेतमालाला खर्चाच्या दीडपट हमीभाव द्यावा
  • एफआरपी हा शेतकऱ्यांचा हक्क ठरवणारं खासगी विधेयक मंजूर करावं
  • पेट्रोल, डिझेल आणि विजेचे दर कमी करावे
  • नवे ट्रक, ट्रॅक्टर परवडत नसल्याने एनजीटीने घतलेली 10 वर्षांच्या वाहनांवरील बंदी हटवा
  • ऊसाची थकलेली 10 हजार कोटींची बिले लवकरात लवकर द्यावी

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.