AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Pawar : सरकार सत्ता टिकवण्यात जास्त मग्न, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष असा टोला रोहित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारला लगावला

कांद्याचा दर आज घसरला आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा खर्च पाहिला, तर 70 ते 80 हजाराच्या आसपास असून एकरी उत्पन्न 30 ते 40 हजार मिळतं. त्यामुळं शेतकऱ्यांना मोठं नुकसान सोसाव लागत आहे अशी खंत रोहित पवारांनी व्यक्त केली.

Rohit Pawar : सरकार सत्ता टिकवण्यात जास्त मग्न, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष असा टोला रोहित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारला लगावला
ROHIT PAWARImage Credit source: tv9marathi
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Feb 16, 2023 | 10:50 AM
Share

अहमदनगर : अहमदनगरला कर्जत (Ahmednagar karjat) तालुक्यात रब्बी हंगामात (Rabi season) यंदा विक्रमी कांदा लागवड झाल्याची माहिती मिळाली आहे. मात्र कांद्याच्या कोसळत्या दरावरून आमदार रोहित पवारांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. “सध्या सरकार सत्ता टिकवण्यात जास्त मग्न आहे, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी नाही” असा टोला त्यांनी शिंदे फडणवीस सरकारला लगावला आहे. “त्याचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना होतोय, लवकरात लवकर राज्य सरकारने निर्णय घेण्याची गरज असल्याची भावना रोहित पवारांनी व्यक्त केली. त्याचबरोबर सरकार स्थापण झाल्यापासून सामान्य जनतेच्या प्रश्नाकडे शिंदे फडणवीस सरकार (shinde fadanvis government) दुर्लक्ष करीत आहे.

रब्बी हंगामात यंदा विक्रमी कांदा लागवड

विशेष म्हणजे यंदा कर्जत तालुक्यात रब्बी हंगामात विक्रमी कांद्या लागवड करण्यात आली आहे. 15 हजार हेक्टरच्या कांदा लागवड झाल्याने कांद्याचे उत्पादन सुध्दा वाढणार असल्याचे रोहित पवारांनी सांगितले. मात्र कांद्याचे दर दिवसेंदिवस कोसळत असल्याने शेतकरीवर्ग मोठा अडचणीत आला आहे. यावरून आमदार रोहित पवारांनी सरकारला चांगलेच धारेवर धरलंय. अतिवृष्टीमध्ये कर्जत तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. उर्वरित कांद्याला दर मिळत नाही, कांद्याचे दर यावर्षी दहा रुपयांच्या खाली आल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघेना, तर कांद्याला चांगला दर मिळेल, या आशेने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कांदा लागवड केली आहे.

शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा खर्च पाहिला…

कांद्याचा दर आज घसरला आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा खर्च पाहिला, तर 70 ते 80 हजाराच्या आसपास असून एकरी उत्पन्न 30 ते 40 हजार मिळतं. त्यामुळं शेतकऱ्यांना मोठं नुकसान सोसाव लागत आहे अशी खंत रोहित पवारांनी व्यक्त केली. या सगळ्या प्रकरणाची दखल राज्य सरकारने घ्यायला हवी होती. कांद्याचे दर घसरत असताना सुद्धा सरकार एकदम शांत आहे. अद्याप एकही बैठक घेतली नसून नाफेडला एक पत्र सुध्दा पाठवलेलं नाही अशी टीका रोहित पवारांनी केली.

कापूस शेतकरी सुध्दा दर वाढवण्याची मागणी सरकारकडे करीत आहे.

शेतकऱ्यांच्या बाबतीतल्या रोज बातम्या कानावर पडत असतात, त्याचबरोबर शेतकऱ्यांना सरकारने हवी तशी मदत करीत नसल्याचे शेतकरी जाहीरपणे सांगत आहेत. कांद्यासह कापूसाचे दर सु्द्धा कोसलळे आहेत. कापूस शेतकरी सुध्दा दर वाढवण्याची मागणी सरकारकडे करीत आहे.

Follow Us
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून मोठी भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार, नवे नियम लागू
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
Devendra Fadnavis On Shetkari Karjmafi | कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत संजय राऊतांनाही खोचक टोला
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
Devendra Fadnavis UNCUT | मोदींच्या 12 वर्षांचा महाअहवाल! भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
Devendra Fadnavis | भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले मोदी सरकारच्या 12 वर्षांचे रिपोर्ट कार्ड
पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
Rohit Pawar | रोहित पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले.....
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले, पश्चात्ताप झाला असेल तर या... रोख कुणाकडे?
काँग्रेसच्या झेंड्याखाली या...राऊतांच्या एका वक्तव्याने चर्चांना उधाण
Sanjay Raut UNCUT | काँग्रेसच्या झेंड्याखाली या... संजय राऊतांच्या त्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ....
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ एवढे टक्के साठा...
विधान परिषदेआधी पवारांच्या गोटात भूकंप; 3 आमदारांनी घेतला मोठा निर्णय
tv9 Marathi Special Report | विधान परिषदेआधी पवारांच्या गोटात भूकंप; 3 आमदारांनी घेतला मोठा निर्णय! राजकारणातील सर्वात मोठा ट्विस्ट