AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘औरंगाबादचं संंभाजीनगर, उस्मानाबादचं धाराशीव करा’

पंकज भनारकर, टीव्ही 9 मराठी, मुंबई: उत्तर प्रदेशात नामांतराची मालिका सुरु असताना, महाराष्ट्रातही मागणी जोर धरु लागली आहे. औरंगाबादचं नाव संभाजीनगर, तर उस्मानाबादचं नाव धाराशीव करण्याची मागणी शिवसेनेने लावून धरली आहे. शिवसेना नेत्यांनी वेळोवेळी ही भूमिका मांडली आहेच, शिवाय आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करुन मुख्यमंत्र्यांना तसा सवाल केला आहे. संजय राऊत यांनी […]

'औरंगाबादचं संंभाजीनगर, उस्मानाबादचं धाराशीव करा'
| Updated on: Nov 07, 2018 | 5:40 PM
Share

पंकज भनारकर, टीव्ही 9 मराठी, मुंबई: उत्तर प्रदेशात नामांतराची मालिका सुरु असताना, महाराष्ट्रातही मागणी जोर धरु लागली आहे. औरंगाबादचं नाव संभाजीनगर, तर उस्मानाबादचं नाव धाराशीव करण्याची मागणी शिवसेनेने लावून धरली आहे. शिवसेना नेत्यांनी वेळोवेळी ही भूमिका मांडली आहेच, शिवाय आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करुन मुख्यमंत्र्यांना तसा सवाल केला आहे. संजय राऊत यांनी “योगी आदित्यनाथ यांनी फैजाबादचे अयोध्या केले, अलाहाबादचे प्रयाग तिर्थ केले, मुख्यमंत्री देवेंद्रजी औरंगाबादचे संभाजी नगर आणि उस्मानाबादचे धाराशीव कधी करणार? जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम!” असं ट्विट केलं आहे.

विचारधारेचा प्रभाव सरकारच्या कामात पडतोच. पण सरकारला कधी कधी जनभावनेचाही विचार करावा लागतो. किंवा मग आपला अजेंडा राबवणं तर त्यांचं काम असतंच. असंच काहीसं सध्या देशात सुरु असल्याचं दिसतंय. कारण शहरांचं नामकरण जोरात सुरु आहे. उत्तर प्रदेशानंतर गुजरात आणि गुजरातनंतर महाराष्ट्रात ही मालिका सुरु होण्याची चिन्हं आहेत.

शहरांची नावं बदलण्याचा सपाटा

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नावं बदलण्याचा सपाटा सुरु केला आहे. अलाहाबादचं नाव प्रयागराज केलं त्यानंतर आता फैजाबादचं जिल्ह्याचं नाव अयोध्या केलं. उत्तर प्रदेशानंतर आता गुजरातमध्येही अहमदाबादचं नाव कर्णावती करणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री नितीन पटेलांनी केली आहे. आता महाराष्ट्रातही औरंगाबादचं नाव संभाजीनगर, तर उस्मानाबादचं नाव धाराशीव करण्याची मागणी शिवसेनेने लावून धरली आहे.

खरं तर याआधीही 1995 मध्ये युती सरकारच्यावेळी बॉम्बेचं नाव मुंबई झालं. पुढे कलकत्ता कोलकाता, मद्रासचं  चेन्नई झालं. सरकार बदललं की विचारधारेप्रमाणं शहरांची नावंही बदलतात. औरंगाबादचं बोलायचं झालं तर शिवसेना आणि भाजपकडून याआधीही संभाजीनगर नाव ठेवण्याची मागणी झाली आहे. पण 4 वर्ष उलटली.

असं असलं तरी प्रश्न सध्या एकच उरतोय की नावं बदलून शहराचा चेहरामोहरा बदलणार आहे का?

Follow Us
शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज, पवारांची प्रकृती....
शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज, पवारांची प्रकृती.....
गिधाड धमक्या देऊ नका, तुम्ही संप पुकारलात तर आम्हीही रस्त्यावर उतरू...
गिधाड धमक्या देऊ नका, तुम्ही संप पुकारलात तर आम्हीही रस्त्यावर उतरू....
बीड कारागृहातून धक्कादायक माहिती, आणखी एक ऑडिओ क्लिप समोर
बीड कारागृहातून धक्कादायक माहिती, आणखी एक ऑडिओ क्लिप समोर.
गांधी हत्येचं मुनींकडून समर्थन, हर्षवर्धन सपकाळ भयंकर संतापले....
गांधी हत्येचं मुनींकडून समर्थन, हर्षवर्धन सपकाळ भयंकर संतापले.....
सदावर्ते यांच्या मराठी विरोधातील भूमिकेला मनसे कार्यकर्त्यांचा विरोध
सदावर्ते यांच्या मराठी विरोधातील भूमिकेला मनसे कार्यकर्त्यांचा विरोध.
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत.
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड.
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान.
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा.
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.