पंकजा मुंडेंनी संगणक परिचालकांच्या प्रश्नावर उत्तर देणं टाळलं!
सागर आव्हाड, टीव्ही 9 मराठी, बीड : संगणक परिचालकांचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. टीव्ही 9 मराठी याबाबत सातत्याने पाठपुरावा करत आहे. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी मात्र उत्तर देणं टाळलं. वेळेवर पगार द्यावा आणि आयटी महामंडळ नियुक्ती ही संगणक परिचालकांची प्रमुख मागणी आहे. यासाठी 27 तारखेला संगणक परिचालक संघटनेकडून मुंबईत […]
सागर आव्हाड, टीव्ही 9 मराठी, बीड : संगणक परिचालकांचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. टीव्ही 9 मराठी याबाबत सातत्याने पाठपुरावा करत आहे. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी मात्र उत्तर देणं टाळलं. वेळेवर पगार द्यावा आणि आयटी महामंडळ नियुक्ती ही संगणक परिचालकांची प्रमुख मागणी आहे. यासाठी 27 तारखेला संगणक परिचालक संघटनेकडून मुंबईत आंदोलनही करण्यात येणार आहे.
बीडमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दुष्काळ पाहणी दौरा होता. यावेळी बीडच्या पालकमंत्री आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडेही सोबत होत्या. पंकजा मुंडे यांना टीव्ही 9 मराठीच्या प्रतिनिधीने संगणक परिचालकांच्या मुद्द्यावर प्रश्न विचारला. मात्र त्यांनी या प्रश्नाला उत्तर देणं गरजेचं समजलं नाही.
काय आहे संगणक परिचालकांचा प्रश्न?
पूर्वीचा संग्राम (संगणकीकृत ग्रामीण महाराष्ट्र) हा प्रकल्प एप्रिल 2011 ते डिसेंबर 2015 पर्यंत शासनाच्या माहिती तंत्रज्ञान आणि ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून महाऑनलाईन कंपनीच्या माध्यमातून चालवण्यात आला. या वेळी राज्यातील 27906 ग्रामपंचायती साठी 22500, 351 पंचायत समिती स्तरावर 702 आणि 34 जिल्हा परिषदेमध्ये 170 असे एकूण 23372 संगणक परिचालक नियुक्त करण्यात आले होते.
महाऑनलाईन कंपनी जिल्हा परिषदेकडून प्रती संगणक परिचालक 8000 मानधन घेत होती. पण संगणक परिचालकांना मात्र 50 रु, 200 रुपये, 1200, 1700, 3500 असं मानधन देऊन उर्वरित निधी हडप करण्याचं काम करत असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेने केलाय.
याबाबत राज्यातील संगणक परिचालकांनी एकत्र येऊन राज्यभरात कंपनीच्या विरोधात आंदोलन, मोर्चे सुरू झाले. राज्य संघटनेच्या वतीने महाऑनलाईन कंपनीवर कारवाई करून संगणक परिचालकांना जिल्हा परिषदेच्या शासन सेवेत समाऊन घेणे ही मागणी ठेवण्यात आली.
संबंधित बातमी :