भारताच्या चॅम्पियन कर्णधाराला मिळतं असं दु:ख, रोहित शर्माही वाचला नाही

26  ऑक्टोबर 2024

Created By: राकेश ठाकुर

भारताने न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका 2-0 ने गमावली आहे. 

रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने पहिल्यांदाच देशात कसोटी मालिका गमावली आहे. 

टीम इंडियाला आतापर्यंत तीन कर्णधारांनी आयसीसी चषक जिंकून दिला आहे. या सर्व कर्णधारांनी भारतात एक कसोटी मालिका गमावली आहे. 

कपिल देवच्या नेतृत्वात 1983 मध्ये वर्ल्डकप जिंकला होता. त्याच वर्षी वेस्ट इंडिजने कसोटी मालिकेत 3-0 ने पराभूत केलं. 

धोनीने 2007 टी20, 2011 वनडे वर्ल्डकप जिंकला. पण त्याच्या नेतृत्वात 2012 मध्ये इंग्लंडविरुद्ध 2-1 मालिका गमावली. 

रोहित शर्माच्या नेतृत्वात 2024 टी20 वर्ल्डकप जिंकलो आणि आता न्यूझीलंडविरुद्ध मालिका गमावली. 

रोहित शर्माच्या नेतृत्वात देशात टीम इंडियाने चौथी कसोटी गमावली आहे.