टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने हरलेला संघ कोणता?
31 July 2024
Created By: राकेश ठाकुर
टी20 क्रिकेट हा सर्वात जलद फॉर्मेट असून विजयासाठी चांगलाच कस लागतो.
टी20 क्रिकेटमध्ये श्रीलंकेच्या नावावर नकोसा विक्रम आहे. श्रीलंका आतापर्यंत 105 सामन्यात पराभूत झाली आहे.
बांग्लादेश आणि वेस्ट इंडिज यांच्या नावावर पराभवाचं नकोसं शतक आहे. वेस्ट इंडिज 101 आणि बांग्लादेश 102 सामन्यात पराभूत झाले आहेत.
न्यूझीलंड आणि झिम्बाब्वे हे दोन संघ टी20 क्रिकेटमध्ये प्रत्येकी 99 सामन्यात पराभूत झाले आहेत. एक पराभव होताच शतक होईल.
पाकिस्तान टी20 क्रिकेटमध्ये 95 सामने, आयर्लंड 89 आणि ऑस्ट्रेलिया 85 सामने गमावले आहेत.
टी20 क्रिकेटमध्ये इंग्लंडने 83, तर दक्षिण अफ्रिकेने 77 सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे.
टी20 क्रिकेटमध्ये भारताचं वर्चस्व दिसून आलं आहे. भारताने आतापर्यंत 69 सामन्यात पराभव सहन केला आहे.