बिश्नोईला का मिळाला प्लेअर ऑफ द सीरिज पुरस्कार ?
04 December 2023
Created By : Manasi Mande
बंगळुरूतील शेवटच्या टी-20 मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाला हरवून भारताने ही सीरिज 4-1 अशी जिंकली.
सीरिज संपल्यावर रवी बिश्नोईला प्लेअर ऑफ द सीरिज पुरस्कार मिळाल्याने अनेक जण हैराण झाले.
रिंकू सिंह किंवा ऋतूराज गायकवाडला हा पुरस्कार मिळायला हवा होता, असे अनेकांना वाटलं.
बिश्नोईने या सीरिजमध्ये सर्वाधिक विकेट्स घेतल्या. 5 मॅचमध्ये त्याने 9 बळी टिपले.
बिश्नोईने जोरदार गोलंदाजी करून ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांवर दबाव टाकला. बहुतांश मॅचमध्ये त्याने पहिल्या ओव्हरमध्येच विकेट घेतली.
कोणत्या खेळाडूने कधी, काय केलं आणि त्याच्या खेळाचा कसा परिणाम झाला, हेही पुरस्कार देताना लक्षात घेतलं जातं.
बिश्नोईने सर्वाधिक विकेट्स तर घेतल्याच पण त्याचा प्रभावही चांगला पडला. म्हणून त्याला हा पुरस्कार देण्यात आला.
टीम इंडियाला मिळाला शमीचा पर्याय, कोण आहे तो गोलंदाज ?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा