आशिया कप जिंकल्यानंतर टीम इंडियाला मिळणार फक्त इतके रुपये

24 July 2024

Created By: राकेश ठाकुर

भारतीय महिला क्रिकेट संघ उपांत्य फेरीत पोहोचला असून, जेतेपदाच्या मोठ्या आशा आहेत.

आशिया कप स्पर्धा जिंकल्यानंतर वुमन्स टीम इंडियाला किती पैसे मिळतील? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. 

स्पर्धा जिंकल्यानंतर पुरुष संघावर कोट्यवधी रुपयांची उधळण होते. पण महिला संघाला खूप कमी पैसे मिळतात.

आशिया चषक स्पर्धेची बक्षीस रक्कम खूपच कमी आहे. चॅम्पियन संघाला 16 लाख, 48 हजार रुपये मिळतील.

पुरुष  संघाने आशिया कप स्पर्धेचं जेतेपद मिळवल्यानंतर 1 कोटी 25 लाख रुपये मिळाले होते. 

पुरुषांना मिळणारी बक्षिसाची रक्कम महिला आशिया चषक स्पर्धेच्या 7 पट अधिक आहे.

आशिया कप उपविजेत्या श्रीलंकेला 62 लाख 35 हजार रुपयांचे बक्षीस मिळाले होते.