'ठरलं तर मग' मालिकेत येणार सर्वात मोठं वळण
20 January 2025
Created By: Swati Vemul
स्टार प्रवाह वाहिनीवरील 'ठरलं तर मग' मालिकेचं कथानक अतिशय रोमांचक वळणावर
अर्जुनने सर्वांदेखत सायलीवरच्या प्रेमाची कबुली दिली
मात्र मधुभाऊंना दिलेल्या वचनाखातर सायली आपल्या मनातील भावना व्यक्त करु शकली नाही
हमात्र ज्या क्षणाची संपूर्ण महाराष्ट्र आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण आता आला आहे
सायली अर्जुनसमोर तिच्या मनातलं प्रेम व्यक्त करणार आहे
मालिकेतलं हे सर्वात मोठं वळण आहे
कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य उघड झाल्यानंतर सुभेदार कुटुंबाने आपली तीव्र नाराजी व्यक्त करुन सायलीला घराबाहेर काढलं
अर्जुनलाही अद्याप त्याच्या कुटुंबियांनी माफ केलेलं नाही
तिकडे मधुभाऊंच्या मनातही अर्जुनविषयी बरेच गैरसमज आहेत
अशा परिस्थितीत अर्जुन-सायली कसे एकत्र येणार याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे
'ठरलं तर मग' ही मालिका रात्री 8.30 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते
'खऱ्या हिरोईनचा जन्म...'; रवीना टंडनच्या 19 वर्षीय लेकीवर कौतुकाचा वर्षाव
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा