मुंबई : डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना काल महाराष्ट्र भूषण पुरस्कार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हा कार्यक्रम काल दुपारी पार पडला. या सोहळ्यात उष्मघातामुळे अनेक श्री सदस्यांना त्रास झाला आहे. या सोहळ्यात उष्माघातामुळे 12 श्रीसदस्यांचा मृत्यू झाला. यावर अमित शाह यांनी ट्विट करत संवेदना व्यक्त केल्या आहेत. “काल झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याला उपस्थित असताना उष्माघाताने प्राण गमावलेल्या श्रीसदस्यांच्या जाण्याने, माझे मन जड झाले आहे. मृतांच्या कुटुंबियांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. जे लोक उपचार घेत आहेत ते लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी मी प्रार्थना करतो”, असं ट्विट अमित शाह यांनी केलं आहे.