Uddhav Thackeray On Bjp : महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसला आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे सर्वात जास्त उमेदवार जिंकून आले. 400 पारची घोषणा, मराठा आरक्षण आणि कांद्याच्या प्रश्नामुळे भाजपला लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसला आहे. अशातच लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीने संयुक्त पत्रकार परिषद घेतली. कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली आहे. साधी गोष्ट आहे. कांदा व्यापारी आणि शेतकरी नाराज होता. तेवढ्यापुरतं मर्यादित नाही. राज्य आणि देशातील शेतकरी भाजपच्या विरोधात होता. त्यात काही बदल झालाय असं वाटत नाही. असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.