ज्याचा जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री हा मंत्र कधीच आघाडीच्या सरकारमध्ये यशस्वी होऊ शकत नाही. कारण मुख्यमंत्री जाहीर केला की आघाडीत एकमेकांच्या जागा पाडल्या जातात, भाजपाबरोबरच्या युतीत आम्हाला याबाबबतीत चांगलाच अनुभव आलेला असल्याचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे. शिवसेना आणि भाजपाची युती असताना साल 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या जागा पाडल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे. आमचा मुख्यमंत्री होऊ नये म्हणून फडणवीस यांनी आमच्या जागा पाडल्याचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. निवडणूकांना सोमोरे जाताना उद्धव ठाकरे यांनी सांगिलले आहे. आघाडीत ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री हे धोरण कधीच यशस्वी यशस्वी होत नाही असेही ते यावेळी म्हणाले.