मुंबई | 24 फेब्रुवारी 2024 : कधीही छत्रपतीचं नाव न घेणारे आमचे शरद पवार यांना आता त्यांना रायगड आठवला आहे. त्यांना शिवाजी महाराजाचं नाव घेतली की मुस्लीमांची मते जातील अशी भीती इतकी वर्षे वाटत होती. आता त्यांना शिवाजी महाराज आठवत आहे. मागे मी पवारांची मुलाखत घेतली होती तेव्हाही त्यांना मी विचारले होत की तुम्ही नेहमी शाहु, फुले आणि आंबेडकराचं नाव घेता, शिवाजी महाराजाचं नाव का घेत नाही असा सवाल केला होता याची आठवण त्यांनी यावेळी करुन दिली. राजकारणाचा इतका चिखल यापूर्वी कधी झाला नव्हता. आता कोण कोणत्या पक्षात आहे हेच कळत नसल्याचेही राज ठाकरे यांनी सांगितले. आपण एखाद्या समवेत व्यासपीठ शेअर केले म्हणजे आमची युती झाली असे होत नाही असेही ठाकरे म्हणाले.