…नाही तर घरी बसा, राहुल नार्वेकर कोणावर संतापले

| Updated on: Feb 24, 2024 | 5:35 PM

भाजपाचे संभाव्य उमेदवार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी लोकसभा आणि विधानसभा मतदार संघाची पाहणी करायला सुरुवात केली आहे. त्यांनी दक्षिण मुंबईतील वरळी मतदार संघाची पाहणी केली. आता लोकं भावनिक राजकारणाला भुलणार नाहीत, लोकांना विकास हवा आहे. त्यांची कामे व्हायला हवीत, तर लोक मतदान करतील असेही राहुल नार्वेकर यांनी म्हटले आहे.

Follow us on

मुंबई | 24 फेब्रुवारी 2024 : लोक आता भावनिक होऊन तुमच्या मागे येणार नाही. लोकांना त्यांची कामे व्हायला पाहीजेत. तरच ती मते देतील. कामे करायची नाहीत केवळ भावनिक होऊन लोकांना सांगायचं हा आमचा बालेकिल्ला आहे हे उपयोगाचे नाही असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी वरळी मतदार संघाचा दौरा केला. राहुल नार्वेकर यांना दक्षिण मुंबईतून निवडणूकीला उभे करण्याची योजना भाजपाने आखली आहे. यासंदर्भात त्यांना विचारले असता पक्ष जी संधी देईल त्यासाठी आपण तयार असल्याचे त्यांनी सांगितले. लोकसभा असो की विधानसभा कोणतीही जबाबदारी पार पाडण्यासाठी आपण तयार असल्याचे राहुल नार्वेकर यांनी सांगितले. वरळी मतदार संघात तीन-तीन आमदार असून जनतेचे प्रश्न सुटलेले नाहीत. वरळी कोळीवाड्याच्या सीमांकनाचा प्रश्न भिजत पडलाय. कुलाबा तर यादीतच नव्हता. आम्ही कुलाबा कोळीवाड्या सीमांकनाच्या यादीत आणले आहे. बीबीडी चाळी संदर्भातला प्रश्न आहे. मुंबईकरांमुळे मला विधानसभेचे अध्यक्ष पद भूषवायला मिळाले आहे, त्यामुळे आपण मतदार संघाची पाहणी करायला आल्याचे त्यांनी सांगितले.