Maharashtra Political Crisis : राज्यातील सत्तासंघर्षावर आज सुनावणी होतेय. शिंदेगटाच्या वतीने अॅड हरीश साळवे यांनी शिंदे गटाची बाजू मांडत आहेत. 16 आमदारांच्या अपात्रतेवर आज युक्तीवाद केला जातोय. या सगळ्या प्रकरणात नबाम रेबिया प्रकरण चर्चिलं गेलं. कालही या प्रकरणाचा उल्लेख झाला होता. तर आज पुन्हा एकदा हा मुद्दा चर्चेत आला. यावर न्यायालयाने महत्वाची टिपण्णी केली आहे. रेबिया प्रकरण जसंच्या तसं इथे लागू होणार नाही. रेबिया प्रकरण आणि ठाकरे-शिंदे केसमधील घटनाक्रम वेगळा आहे, असं न्यायालयाने म्हटलं आहे.