अमरावती | 24 फेब्रुवारी 2024 : मनोज जरांगे पाटील यांनी आतापर्यंत शांततेने आंदोलन केले आहे. त्यांची उंची या आंदोलनाने वाढली आहे, काही शक्ती या आंदोलनाला वेगळ वळण लागावे यासाठी कार्यरत आहेत. जरांगे पाटील यांनी त्यास बळी पडू नये. प्रत्येकाचा मागण्याचा हक्क आहे. त्यांनी सागर बंगल्यावर जाऊन आंदोलन करु नये. उद्या या आंदोलनात काही वेगळं घडलं तर चुकीचा संदेश जाईल. त्यांच्या व्यक्तीमत्वाला डाग लागला तर चुकीचं होईल.अजय महाराज बारस्करांचे आरोप चुकीचे आहे. जरांगे यांच्यावर अजय महाराज बारसकर यांनी व्यक्तीगत टिका टीपण्णी करु नये, मराठा समाजाच्या भावना तीव्र आहेत, त्यांना थांबवा असे लोक रडून मला फोन करीत आहेत असेही बच्चू कडू यांनी म्हटले आहे. मी त्यांना पक्षातून काढले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.