मुंबई : रस्सीखेच नाही. रंग बदलणाऱ्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. सरडाही रंग बदलतो हे लोकांना माहित आहे. देशाला हिंदुत्वाचा विचार कोणी दिला, बाळासाहेब ठाकरे यांनी दिला. गर्व से कहो हिंदू है, असं त्यांनी म्हटलं. हिंदुत्व म्हणजे पाठीत खंजीर खुपसणे नाही. गेली दोन वर्ष तुणतुणे लावले आहेत, त्यांना 14 ला उत्तर मिळेल. बृजभूषण सिंग यांना असली कोण आहे हे कळलं आहे. त्यामुळे ते आदित्य ठाकरे यांचे स्वागत करतील, असे शिवसेना नेते अरविंद सावंत म्हणाले.