पुणे : राहुल गांधींच्या विरोधात पुणे सत्र न्यायालयात मानहानीचा दावा दाखल करण्यात आला आहे. सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी हा दावा केला आहे. 15 तारखेला पुणे न्यायालयात मानहानीच्या दाव्यासंदर्भात सुनावणी होणार आहे. राहुल गांधींनी इंग्लंडमध्ये भाषण केलं होतं. एका मुस्लिम व्यक्तीला सावरकर आणि त्यांचे पाच सहा मित्र मारत होते. तेव्हा सावरकरांना आनंद होत होता. असं त्यांनी पुस्तकात लिहिले आहे, असं राहुल गांधी म्हणाले होते. त्यावर सात्यकी सावरकर यांनी आक्षेप घेतला आहे. राहुल गांधींची ही कथा काल्पनिक आहे, असं म्हणत सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधींच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे.