उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील गणरायाला साकडे घातले आहे. आज गणेश चतुर्थी असल्याने महाराष्ट्राचा हा दिवाळीनंतरचा सर्वात मोठा सण मानला जातो. यानिमित्त अमृता फडणवीस यांनी महाराष्ट्राला जे जे चांगले असेल ते ते मिळो अशी प्रार्थना अमृता फडणवीस यांनी केली आहे. महाराष्ट्राच्या प्रथतीत कोणतेही अडथळे (रोडे ) येऊ नयेत अशीही प्राथर्ना अमृता फडणवीस यांनी गणरायाला केली असल्याचे म्हटले आहे, या प्रसंगी मिडीयाने अमृता फडणवीस यांनी गाण्याची देखील विनंती केली. परंतू आपला गळा आज नीट नसल्याने गायला सांगू नका पण मी एकच म्हणेल की गणपती बाप्पा मोरया…