Video | अरबी समुद्रात चक्रीवादळांचे प्रमाण वाढले, कारण काय ?
अरबी समुद्रात चक्रीवादळांचे प्रमाण वाढले, कारण काय ?
मुंबई : तौत्के चक्रीवादळ हे या वर्षातील पहिले वादळ आहे. या वादळाचा फटका महाराष्ट्र, गोवा, गुजरात या राज्यांना बसतोय. तसे पडसाद महाराष्ट्रात उमटायला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर तसेच मुंबई या जिल्ह्यांना पावसाने अक्षरश: झोडपून काढलंय. शेकडो घरांची पडझड झालीये. तर अनेकांचा मृत्यूसुद्धा झाला आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वादळामुळे सध्या हे संकट उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर अरबी समुद्रात चक्रीवादळं का निर्माण होत आहेत, याची माहिती देणार हा स्पेशल रिपोर्ट नक्की पाहा…