नवनीत राणा यांच्या माझा काही व्यक्तीगत संघर्ष नाही पण काही गोष्टी खटकल्या पण संघर्ष कायम राहिल असं नाही, असं वक्तव्य प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी म्हटलं. तर बच्चू कडू यांनी केलेल्या वक्तव्यावर भाजपच्या नेत्या नवनीत राणा यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. ‘दगा एक बार हो सकता है बार बार नही’, असं नवनीत राणा यांनी म्हणत बच्चू कडू यांच्यावर पलटवार केला आहे. पुढे त्या असेही म्हणाल्या, ‘मी भाजपची कार्यकर्ता म्हणून काम करत राहणार आहे. मी लवकरच देश पातळीवर काम करणार आहे. नेत्यांचा आदेश म्हणून मी काम करणार असून महायुतीचे सरकार परत आणणार आणि या राज्यात महायुतीचे सरकार आणि देवेंद्र फडणवीस हे सगळ्यांना न्याय देऊ शकतील ‘, असा विश्वासही नवनीत राणांनी व्यक्त केला.