WITT Global Summit : सायबर फ्रॉडला सामोरं जाणं हे बँकांसाठी मोठं आव्हान, BharatPe चे रजनीश कुमार यांनी व्यक्त केली चिंता

| Updated on: Feb 26, 2024 | 3:06 PM

'कनेक्टेड बँकिंग ही काळाची गरज आहे. आज मोबाईलशिवाय कोणीही राहू शकत नाही, हे सध्याच्या काळातील वास्तव आहे. अशा परिस्थितीत जेव्हा जेव्हा नवीन तंत्रज्ञान येते तेव्हा काही चांगल्या आणि काही वाईट गोष्टीही येतात', BharatPe चे रजनीश कुमार यांनी व्यक्त केली चिंता

Follow us on

नवी दिल्ली | 26 February 2024 : देशात ज्या प्रकारे ऑनलाइन बँकिंग आणि फिनटेक कंपन्या विस्तारत आहेत, त्यामुळं सायबर फसवणूकीला सामोरे जाणं हे सगळ्यात मोठं आव्हान आहे. असे भारतपेचे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी TV9 च्या ग्लोबल समिटमध्ये मोठं भाष्य केलं. ते म्हणाले की, गेल्या काही वर्षांत भारतातील बँकिंगचे जग झपाट्याने बदलले आहे. इंटरनेटच्या विस्तारामुळे लोकांच्या बँकिंग गरजा शाखेत जाण्याऐवजी कनेक्टेड बँकिंगमध्ये बदलल्या आहेत. अशा परिस्थितीत त्याच्यासमोर अनेक आव्हाने आहेत. SBI चे अध्यक्ष असताना YONO सारखी सेवा सुरू करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे रजनीश कुमार म्हणाले की, आज आपण एका जोडलेल्या जगात राहतो. अशा परिस्थितीत कनेक्टेड बँकिंग ही काळाची गरज आहे. आज मोबाईलशिवाय कोणीही राहू शकत नाही, हे सध्याच्या काळातील वास्तव आहे. अशा परिस्थितीत जेव्हा जेव्हा नवीन तंत्रज्ञान येते तेव्हा काही चांगल्या आणि काही वाईट गोष्टीही येतात. कनेक्टेड बँकिंगच्या बाबतीतही असेच असल्याचे रजनीश कुमार यांनी म्हटले.