नितेश राणेंची वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरुच, विरोधकांकडून टीका तर महायुतीच्या नेत्यांची नाराजी

| Updated on: Sep 13, 2024 | 10:28 AM

भाजप आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. सर्वधर्म समभाव मानायचं नाही, फक्त हिंदूंशी व्यवहार करा अशी शपथ घ्या, असं विधान नितेश राणे यांनी नवी मुंबईत केलं. दरम्यान त्यांच्या या विधानानंतर चागलंच राजकारण तापलं आहे. बघा व्हिडीओ

Follow us on

भाजप आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. सर्वधर्म समभाव मानायचं नाही, फक्त हिंदूंशी व्यवहार करा अशी शपथ घ्या, असं विधान नितेश राणे यांनी नवी मुंबईत केलं. दरम्यान त्यांच्या या विधानानंतर चागलंच राजकारण तापलं आहे. भाजप आमदार नितेश राणे पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यामुळे वादात सापडले आहेत. नितेश राणेंच्या वक्तव्यानंतर महायुतीच्या नेत्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. कोणीही दोन धर्मात तेढ निर्माण करण्याचं काम करु नये असं मत उदय सामंतांनी व्यक्त केलं. तसंच कोणी चुकत असेल तर शिक्षा झालीच पाहिजे असा इशाराही त्यांनी दिला. नितेश राणेंच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची ही काही पहिली वेळ नाहीये. रामगिरी महाराजांवरुन सुरु झालेल्या वादानंतर नितेश राणेंनी मशिदीत घुसून मारण्याची भाषा केली होती. इतकंच नाहीतर सांगलीत देखील लव्ह जिहादच्या मुद्द्यावरुन नितेश राणेंनी पोलिसांसंदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. दरम्यान त्यांच्या या वक्तव्यानंतरही वादंग निर्माण झालं होतं आणि आता पुन्हा ते वादात सापडले आहेत. बघा या संदर्भातील स्पेशल रिपोर्ट