WITT Global Summit : माझ्या तिसऱ्या कार्यकाळात भारताचं सामर्थ्य नवी भरारी घेणार, मोदींनी व्यक्त केला विश्वास

| Updated on: Feb 26, 2024 | 10:51 PM

गेल्या 10 वर्षांपासून हाच आमचा मंत्र आहे, हीच आमची विचारसरणी, सबका साथ- सबका विश्वास. आज भारत आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी अहोरात्र काम करत असल्याचे म्हणताना मोदी म्हणाले, आम्ही राजनितीवर नाही तर राष्ट्रनीतीवर विश्वास ठेवतो

Follow us on

नवी दिल्ली, २६ फेब्रवारी २०२४ : TV9 नेटवर्कच्या ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ ग्लोबल समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टिव्ही ९ नेटवर्कचे तोंडभरून कौतुक केले. यासह विविध विषयांवर भाष्य केले. मोदी म्हणाले, माझ्या तिसऱ्या कार्यकाळात भारताच्या क्षमतेला नव्या उंचीवर न्यायचे असल्याचे त्यांनी म्हटले. TV9 नेटवर्कच्या ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ ग्लोबल समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळाचा अजेंडा जाहीर केला आहे. देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, येणारी 5 वर्षे खूप महत्त्वाची आहेत. गेल्या 10 वर्षांपासून हाच आमचा मंत्र आहे, हीच आमची विचारसरणी, सबका साथ- सबका विश्वास. आज भारत आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी अहोरात्र काम करत असल्याचे म्हणताना मोदी म्हणाले, आम्ही राजनितीवर नाही तर राष्ट्रनीतीवर विश्वास ठेवतो.