‘एनडीए’चे आकडे आलेत पण ‘इंडिया’नं मुसंडी मारल्यानं भाजपला धडकी, बहुमत पण 400 चा नारा फेल

| Updated on: Jun 05, 2024 | 11:09 AM

४०० पारच्या घोषणेला ब्रेक लागला असून एनडीएला ३०० च्या आतच इंडिया आघाडीने रोखलं आहे. पण आता नितीश कुमार आणि चंद्रबाबू यांच्याकडे इंडिया आघाडीच्या नजरा लागल्या आहेत. त्यामुळे उलटफेर करण्याचा प्रयत्न इंडिया आघाडीचा असणार असल्याचे म्हटलं जात आहे.

Follow us on

लोकसभा निवडणुकीचा निकाल समोर आला आहे. या निकालात एनडीएच्या बाजूने बहुमत आलं मात्र ४०० पारच्या घोषणेला ब्रेक लागला असून एनडीएला ३०० च्या आतच इंडिया आघाडीने रोखलं आहे. पण आता नितीश कुमार आणि चंद्रबाबू यांच्याकडे इंडिया आघाडीच्या नजरा लागल्या आहेत. त्यामुळे उलटफेर करण्याचा प्रयत्न इंडिया आघाडीचा असेल तर दुसरीकडे महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मोठं य़श मिळालं असून भाजपला मात्र जबर फटका बसला आहे. सत्ता स्थापन होईल इतके एनडीचे आकडे नक्कीच आलेत तर इंडिया आघाडीनं मुसंडी मारल्याने भाजपला धडकी भरली आहे. ५४३ पैकी एनडीएचे २९४ खासदार जिंकले तर इंडिया आघाडीचे २३३ खासदार आलेत. एनडीएतून भाजपच्या २४१ जागा आल्यात. २०१९ मध्ये भाजपच्या एकट्याच्या ३०३ जागा आल्या होत्या. इंडिया आघाडीत १०० खासदार जिंकलेत तर २०१९ मध्ये काँग्रेसच्या ५२ जागा आल्या होत्या त्यामुळे काँग्रेसला ४८ खासदारांचा फायदा झाला. बहुमताचा आकडा २७२ आहे. सध्या एनडीएकडे बहुमत आहेत. मात्र अजूनही इंडिया आघाडीच्या आशा अद्याप पल्लवीत आहे. त्याचं कारण म्हणजे भाजप सोबत असलेले दोन मित्र पक्ष.. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट