Lok sabha Election Exit Poll 2024 : देशात मोदी गॅरंटी चालली की नाही? विजय चोरमारे काय म्हणाले?

| Updated on: Jun 01, 2024 | 7:02 PM

विजय चोरमारे यांनी भाजप आणि मोदींच्या गॅरंटीवर भाष्य केले आहे. दहा वर्षातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कारभार आणि त्यांनी दिलेल्या आश्वासनांचा आनंदी आनंद असल्याने असंतोष मोठ्या प्रमाणात होता. हाच असंतोष येत्या 4 जूनला मतपेटीच्या माध्यमातून लोकसभेचा निकाल लागेल त्या दिवशी दिसणार असल्याचे त्यांनी म्हटले

Follow us on

आज लोकसभेच्या शेवटच्या टप्प्याच्या मतदानानंतर एक्झिट पोलचे आकडे जाहीर होत आहेत. अशातच राजकीय विश्लेषक देखील आपले आपले अंदाज वर्तवत आहे. विजय चोरमारे यांनी भाजप आणि मोदींच्या गॅरंटीवर भाष्य केले आहे. दहा वर्षातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कारभार आणि त्यांनी दिलेल्या आश्वासनांचा आनंदी आनंद असल्याने असंतोष मोठ्या प्रमाणात होता. हाच असंतोष येत्या 4 जूनला मतपेटीच्या माध्यमातून लोकसभेचा निकाल लागेल त्या दिवशी दिसेल, असे म्हणत विजय चोरमारे यांनी सडकून टीका केली. देशाच्या पंतप्रधानाने कोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढवायला पाहिजे? मोदी म्हणजे एम हा एम फॅक्टरच त्यांनी सुरूवातीपासून शेवटपर्यंत निवडणुकीत त्यांनी दाखवला. तो म्हणजे मोदी, मंगळसूत्र, मच्छी, मटण, मुस्लिम, मुजरा यावरच मोदींनी सर्व लोकसभेचा प्रचार केला असल्याचे म्हणत विजय चोरमारे यांनी भाजपसह मोदीला टोला लगावला. तर भाजपचा जो जाहीरनामा होता त्यावर न बोलता मोदी काँग्रेसच्याच जाहीरनाम्यावर बोलत राहिले, असे म्हणत विजय चोरमारे यांनी खोचक टीका भाजपवर केली.