Manoj Jarange patil sabha Live : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची आज पुण्याच्या राजगुरुनगर या ठिकाणी जाहीर सभा सुरु आहे. या सभेसाठी लाखो मराठा बांधव उपस्थित आहेत. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांग पाटील यांनी सरकारला अल्टिमेटम दिला आहे आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही असं ही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आहे. १०० एकर जागेवर मनोज जरांगे पाटील यांची ही सभा होत आहे. शांततेचं युद्ध सरकारला पेलणार नाही असं देखील जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. मराठा बांधव कावळे यांच्या मृत्यूला सरकारच जबाबदार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी आरोप केला आहे. मनोज जरांगे पाटील महाराष्ट्रभरात जावून मराठा बांधवांना भेटत आहे. आपल्यावर अन्याय करायला सरकार सोडून कोणीच तयार नाही. येथे येवून बघा नजर देखील पुरणार नाही. असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. मराठा आरक्षणासाठी ज्यांनी आत्महत्या केल्या त्यांचं बलिदान वाया जावू देणार नाही. सरकारच्या भूमिकेमुळे आत्महत्या होत आहेत. त्यामुळे सरकार याला जबाबदार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.