ओबीसी नेते एक झालेत, मराठा नेते काय करताय? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. एकटा पडलोय तरी मी लढणार… ठासून सांगतोय.. असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. ‘मला खूप बोलले आहेत. जे आजू-बाजूला गेलेत त्यांनाही माहिती आहे. मला किती घाण बोलले आहेत. पण मी जातीसाठी पचवतोय. माझा म्हणण्याचा अर्थ एकच आहे की, ओबीसी नेते एक झालेत. मी एकटा पडलोय… मराठ्यांचे नेते काय करताय?’, असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी मराठा नेत्यांनाच थेट अप्रत्यक्षपणे सवाल केलाय. पुढे मनोज जरांगे पाटील असेही म्हणाले, मी एकटा जरी राहिलो तरी लढणार…हे ठासून सांगतोय, असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगत असताना १३ जुलै रोजी धमाका होणार असल्याचा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला.