एसटी कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्यापैकी पगारवाढीची मागणी मान्य झाल्यानंतर अखेर लालपरीचा संप मागे घेण्यात आला. मात्र अशा निर्णयानंतर श्रेयवाद कसा रंगतो, याचं ज्वलंत उदाहरण सह्याद्री अतिथीगृहाबाहेर पाहायला मिळालं. पगारवाढीचा निर्णय जाहीर केल्यानंतर कुणी एकच छंद गोपीचंद असं म्हणत होतं. तर कोणी नथुराम गोडसे जिंदाबादच्या घोषणा देत होतं. तर काहींनी शिंदे-फडणवीसांचे आभार मानले तर काही जणांनी उदय सामंतांना श्रेय दिलं. तर कोणी एसटी कर्मचाऱ्यांचा एकतेचे नारे दिलेत. दोन दिवसांच्या संपात एकूण ११ एसटी संघटना सहभागी झाल्या होत्या. त्यामध्ये सदावर्तेंची संघटना कुठेच नव्हती, याऊलट संप पुकारणाऱ्यांना सदावर्ते किडे म्हणाले. पण सरकारच्या निर्णयानंतर गुलाल उधळण्यात सदावर्ते सर्वात पुढे दिसले. आधी सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात सरसकट साडे सहा हजारांची वाढ झाली असल्याचे सांगितले गेले, नंतर २०२१ साली करण्यात आलेली वाढ साडे ६ हजारांपर्यंत करण्यात आल्याची माहिती समोर आली. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट