नाशिक जिल्हात गेल्या चार ते पाच दिवसांपासून सातत्याने मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे नाशिक जिल्हातील नद्यांना पूर आलीयं. तसेच धरणातील पाणीसाठा वाढला देखील आहे. गंगापूर धरणातून सलग तिसऱ्या दिवशी पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे नदी काठच्या लोकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलायं. गिरणा नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात स्टंटबाजी करताना तरूण वाहून गेल्याने मालेगावात एकच खळबळ उडाली आहे. जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यात स्टंटबाजी करताना यापूर्वींही अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.