बच्चू कडू हे तोडीबाज आणि मांडवलीबाज नेते आहेत. ते खोक्याचं राजकारण करत आले आहेत. ते कुणाचीही सुपारी घेऊ शकतात. त्यांना मातोश्रीवरून रसद आली, अनेक ठिकाणाहून रसद आली. उमेदवारी मागे घेण्यासाठी माझ्यासोबत बार्गेनिंग करण्यात आली. हे सर्व मी अचलपूरच्या जनतेला योग्यवेळी सांगणार आहे, असं आमदार रवी राणा यांनी म्हणत इशारा दिला आहे. तर बच्चू कडू यांचं महाराष्ट्रात ब्लॅकमेलिंग, वसुलीत त्यांचं नंबर वन काम आहे. ज्या ताटामध्ये खातात त्यांच्यात पाठीत खंजीर खुपसण्याचे काम अचलपूर मतदारसंघाच्या आमदाराने नेहमी केले आहे, असं म्हणत रवी राणांनी अप्रत्यक्षपणे बच्चू कडूंवर निशाणा साधला आहे. जो चेहरा आपल्याला दिसतो. तो चेहरा फक्त पडद्यावरचा आहे, मात्र खरा चेहरा हा कपट आहे. खोक्याचं राजकारण कसं झालं. गेल्या सरकारमध्ये राहून मंत्री पद भोगलं आता खोक्यांसाठी बाहेर पडून महायुतीला ब्लॅकमेल करत आहेत, असा आरोपही रवी राणांनी बच्चू कडूंवर बोलताना केला.