लाडक्या भाऊ-बहिणीनंतर आता लाडका दिव्यांग, लाडका शेतकरी येणार? सरकारकडे कोणाची मागणी?

| Updated on: Jul 19, 2024 | 10:48 AM

राज्य सरकारच्या लाडका भाऊ योजनेनंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. या योजनेवरून विरोधकांनी सरकारवर टीका करत गंभीर आरोप केली आहे. लाडका भाऊ योजनेनंतर विरोधकांनी सरकारला धारेवर धरलंय. राज्य सरकारच्या याच योजनांवरून विरोधकांनी सरकारलाच धारेवर धरलंय.

Follow us on

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझी लाडकी बहीण या योजनेनंतर लाडका भाऊ योजनेची घोषणा केली. राज्य सरकारच्या लाडका भाऊ योजनेनंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. या योजनेवरून विरोधकांनी सरकारवर टीका करत गंभीर आरोप केली आहे. लाडका भाऊ योजनेनंतर विरोधकांनी सरकारला धारेवर धरलंय. तर अशा योजनेनं तरूणांची फसवणूक होत असल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केला आहे. तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर योजनेची घोषणा केल्याचे म्हणत आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे. मात्र दुसरीकडे सत्तेत असणाऱ्या बच्चू कडू यांनी लाडका दिव्यांग योजना सुरू करण्याची मागणी केली. तर एमआयएमचे खासदार जलील यांनी लाडका शेतकरी योजना सुरू करण्याची मागणी केली आहे. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट