राज्य सरकारमध्ये रहायचं की नाही ते 5 तारखेला ठरवू : राजू शेट्टी

राज्य सरकारमध्ये रहायचं की नाही ते 5 तारखेला ठरवू : राजू शेट्टी

| Updated on: Mar 18, 2022 | 7:00 PM

हे सरकार जुलमी सरकार आहे. शेतकऱ्यांचे, विद्यार्थ्यांचे आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यात या सरकारला अपयश आलं आहे, असं राजू शेट्टी म्हणाले आहेत.

माजी खासदार राजू शेट्टी महाविकास आघाडी सरकार वर टीका केली आहे.  हे सरकार जुलमी सरकार आहे. शेतकऱ्यांचे, विद्यार्थ्यांचे आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यात या सरकारला अपयश आलं आहे.   राजकीय पक्ष एकमेकांवर चिखलफेक करत आहेत. सर्वसामान्यांचे प्रश सोडवण्यासाठी त्यांनी एकत्र यावे, असं राजू शेट्टी म्हणाले.  तर, येणाऱ्या 5 तारखेला राज्यसरकार मध्ये राहायचे का ते कार्यकारणी मेळाव्यात ठरवू, असं देखील ते म्हणाले.

‘जेवढं दडपण आणाल,तेवढी उसळी मारुन पुढे येईन’, Pravin Darekar यांचं ठाकरे सरकारला आव्हान
गुलाम नबी आझाद यांनी घेतली सोनिया गांधींची भेट