लोकसभा निवडणुकीत केंद्रीय निवडणूक आयोगाचे वर्तन पक्षपाती असल्याचे म्हणत, सामनाच्या रोखठोकमधून केंद्रीय निवडणूक आयोगावर निशाणा साधण्यात आला आहे. २०२४ च्या निव़डणुकीत भारताच्या केंद्रीय निवडणूक आयोगाचे वर्तन सरळ पक्षपाती होते, असे म्हणत टीका करण्यात आली आहे. इतकेच नाहीतर भाजपची घोडदौड ११० ते १२० वरच थांबणार होती. निवडणूक आयोगाच्या पक्षपातामुळे २४० चा आकडा गाठता आला. धनुष्यबाण, घड्याळ ही चिन्हे गोठवायलाच हवी होती. पण फुटिरांना ही चिन्हे देण्याचं काम निवडणूक आयोगाने केले आहे. मशाल, तुतारी वाजवणाऱ्या माणसाला ही आव्हान उभे करण्याचा प्रयत्न झाला, असे आरोप हल्लाबोल करत कुंपनाने शेत खाल्ले असेच घडल्याचा आरोप सामनाच्या रोखठोकमधून निवडणूक आयोगावर करण्यात आला आहे. बघा व्हिडीओ नेमकं काय म्हटलंय सामनातील रोखठोक सदरातून?