विधानपरिषदेत भाजप आमदार प्रसाद लाड यांना शिवीगाळ केल्यानंतर अंबादास दानवे यांचं अखेर पाच दिवसांसाठी निलंबन करण्यात आलं आहे. तर पक्षप्रमुख या नात्यानं उद्धव ठाकरे यांनी दानवेंच्या वतीने महिलांची माफी मागितली. कामकाज सुरू होताच संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या पाच दिवसाच्या निलंबनावर प्रस्ताव सादर केला. यावर आवाजी मतदान करून उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी अंबादास दानवे यांचं निलंबन केलं. निलंबनाच्या ठरावावर विरोधकांनी चर्चेची मागणी केली. पण ही मागणी फेटाळण्यात आली. तर उद्धव ठाकरे यांनी एकतर्फी निलंबनाचा ठराव अपराध असल्याचे म्हटले आहे. सभागृहात आपल्याला संधी दिली असती तर प्रसाद लाडच नाहीतर सभागृहाची दिलगिरी व्यक्त केली असती, असं दानवे म्हणाले. बघा नेमका काय झाला गदारोळ?