जालना जिल्ह्यात बळीराजाच्या मदतीला स्वाभिमानी शेतकरी संघटना धावून आली आहे. जालना जिल्ह्यातील बँक ऑफ महाराष्ट्र शाखा वरूड बुद्रुक येथील शाखेत शेतकऱ्याला विनाकारण त्रास आणि अडवणूक केली जात होती. दुष्काळाचे अनुदान, दुधाचे अनुदान, घरकुलाचे अनुदान, विधवा, निराधार, वयोवृध्द या सर्वांच्या पैशाला थांबवून पिक कर्ज भरून द्या, अशी अडवणूक बँकेकडून शेतकऱ्याची केली जात असल्याचे पाहायला मिळत आहे. याच कारणामुळे शाखा व्यवस्थापकाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते मयुर बोर्डे यांनी कानशिलात लागवत चांगलाच चोप दिला. शेतकऱ्यांना विनाकारण त्रास देत अडवणूक केल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना चांगलीच आक्रमक झाली आहे. दरम्यान, शेतकऱ्याची कामे लवकरात लवकर करून द्यावेत, असे सांगितले तर शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल मयुर बोर्डे यांनी या बँक अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली.