सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण भागात असलेल्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा सोमवारी कोसळल्याची घटना घडली. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात विरोधक आणि शिवप्रेमींमधून संतापाची भावना व्यक्त होत आहे. गेल्या वर्षी 4 डिसेंबरला नौदलच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण कऱण्यात आलं होतं. मात्र 8 महिने 22 दिवसांत 28 फूट उंचीचा पुतळा कोसळला कसा? असा सवाल सध्या उपस्थितीत केला जात आहे. आज भाजप नेते निलेश राणे आणि नारायण राणे दोघेही राजकोट किल्ल्यावर उपस्थित होते. मात्र याच वेळी मविआ नेते तिथे दाखल झाल्याने निलेश राणे यांनी पोलिसांशी हुज्जत घातली. यादरम्यान, राणे समर्थक आणि ठाकरे समर्थक दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकाच्या अंगावर धावून गेल्याचे पाहायला मिळाले. तर यावेळी ठाकरेंची एक वाघीण राणेंना भिडल्याचे पाहायला मिळाले. बघा नेमकं काय घडलं?