शासन आपल्यादारी हा बोगसपणा, दारातही कुणी उभं करत नाही; उद्धव ठाकरे यांचा सरकारवर हल्लाबोल

| Updated on: Dec 05, 2023 | 4:28 PM

उद्धव ठाकरे यांनी शासन आपल्या दारी हा बोगसपणा असल्याचे म्हणत उद्धव ठाकरे यांनी सरकारच्या शासन आपल्या दारी या शासकीय कार्यक्रमावरच जोरदार टीका केली आहे. तर सरकारला आता कुणी दारातही उभं करायला तयार नाही, असे म्हणत सरकारवर घणाघात केलाय.

Follow us on

मुंबई, ५ डिसेंबर २०२३ : कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या परळी मतदारसंघात आज शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होतोय. अशातच उद्धव ठाकरे यांनी शासन आपल्या दारी हा बोगसपणा असल्याचे म्हणत उद्धव ठाकरे यांनी सरकारच्या शासन आपल्या दारी या शासकीय कार्यक्रमावरच जोरदार टीका केली आहे. तर सरकारला आता कुणी दारातही उभं करायला तयार नाही, असे म्हणत सरकारवर घणाघात केलाय. ज्यावेळी मविआचं सरकार असताना नागपुरातील अधिवेशनात मुख्यमंत्री म्हणून २ लाखांपर्यंतच कर्ज माफ केले होते, असे म्हणत असताना शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे. कोरोना काळात शेतकऱ्यांनी अर्थव्यवस्था तारली होती. आता मात्र शेतकऱ्यांमागे संकटांमागून संकटं येताय. शेतकऱ्यांचे कर्ज वाढत चाललं असताना बँकेचे तगादे मागे लागले असल्याचे सांगितले तर सरकारने त्यांची सुरू असलेली ही थोतांडं, नाटकं बंद करा. कर्जमुक्ती करा. घोषणा करून भुलभुलैय्या करू नका, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी सरकारला विनंती केली आहे.