बापलेकात वाद झाला, दोघेही शांत झाले म्हणून आई बाजूला गेली, परत येऊन पाहते तर पायाखालची जमीनच सरकली !

| Updated on: Jun 18, 2023 | 12:51 PM

बापलेकामध्ये जमिनीचा वाद टोकाला गेला. दोघांमध्ये जोरदार भांडण झाले आणि काही वेळाने दोघे शांतही झाले. यानंतर आई निघून गेली अन् परत आली तर तिला धक्काच बसला.

बापलेकात वाद झाला, दोघेही शांत झाले म्हणून आई बाजूला गेली, परत येऊन पाहते तर पायाखालची जमीनच सरकली !
कौटुंबिक वादातून सासऱ्याने सुनेला संपवले
Follow us on

अजमेर : राजस्थानमध्ये नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. जमिनीच्या वादातून मुलाने बापाची हत्या केल्याची धक्कादायक घटना राजस्थानमधील अजमेर येथे घडली आहे. याप्रकरणी आईच्या फिर्यादीवरुन मुलाविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे. पोलीस आरोपीची चौकशी करत आहेत. बेगाराम असे मयत पित्याचे नाव असून, मुकेश असे आरोपी मुलाचे नाव आहे. पाली जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

जमिनीचा वाद टोकाला गेला अन्…

बाप-बेट्यामध्ये आईसमोरच जमिनीवरुन वाद झाला. काही वेळाने वाद शांत झाला, म्हणून आई तिथून गेली. थोड्या वेळाने परत आली तर समोरचं दृश्य पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. महिलेचा पती जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. तिने तात्काळ पोलिसांनी माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.

पोलिसांकडून आरोपी ताब्यात

पोलिसांनी महिलेकडे चौकशी केली असता, महिलेने पोलिसांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. बाप-लेकामध्ये जमिनीवरुन वाद झाला होता. त्यामुळे मुलाने दारुच्या नशेत बापाची हत्या केली असावी, अशी शंका महिलेने पोलिसांकडे व्यक्त केली. यानंतर पोलिसांनी फरार झालेल्या मुलाचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले. पोलीस आरोपीची चौकशी करत आहेत.

हे सुद्धा वाचा