भाजपाच्या ऐतिहासिक विजयाने कॉंग्रेस पक्ष कार्यालयात तूफान हाणामारी, 20 जणांवर गुन्हा दाखल, कुठे घडली घटना पाहा

| Updated on: Jun 08, 2024 | 10:12 PM

भाजपाने ऐतिहासिक विजय मिळविल्याने कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे 20 जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत.

भाजपाच्या ऐतिहासिक विजयाने कॉंग्रेस पक्ष कार्यालयात तूफान हाणामारी, 20 जणांवर गुन्हा दाखल, कुठे घडली घटना पाहा
congress
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

लोकसभा 2024 चे निकाल लागले आहेत. भाजपाप्रणित आघाडी एनडीएचे सरकार उद्या शपथविधी घेत आहे. या निवडणूकांत अनेक दिग्गज उमेदवारांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. भाजपाच्या 15 मंत्र्यांचा पराभव झाला आहे. तर उत्तर प्रदेशातील काही राज्यात तर भाजपाला मोठा धक्का बसला आहे. तर महाराष्ट्रात देखील काही मंत्री पराभूत झाले आहेत. महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या जबाबदारीतून मुक्त करा अशी विनंती पक्षश्रेष्टींना केली होती. आपण पक्ष कार्याला वाहून घेणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. कॉंग्रेसमध्येही देखील पराभवाचे आणि अपेक्षित यश न मिळाल्याचे आफ्टर शॉक्स जाणवत आहेत.

केरळातील त्रिशूर लोकसभा मतदार संघात प्रथमच भारतीय जनता पार्टीचा ऐतिहासिक विजय झाला आहे. येथे कॉंग्रेस नेते मुरलीधन यांच्या पराभवाने कॉंग्रेसच्या स्थानिक कार्यालयात महाभारत घडले आहे. आणि पक्ष सहकाऱ्यांतच मोठी हाणामारी झाली. पोलिसांनी शनिवारी त्रिशूर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या ( डीसीसी ) चे सचिव सजवीन कुरियाचिरा यांच्या तक्रारीवरुन जोस वल्लूर आणि पक्षाच्या 19 अन्य सदस्यांविरोधात प्राथमिक फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी बेकायदा जमाव जमविणे, दंगल करणे, दुखापत करणे, आदी भादंवि कलमांर्गत गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.

काय झाले नेमके ?

कुरियाचिरा यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की शुक्रवारी डीसीसी अध्यक्ष वल्लूर आणि त्यांच्या समर्थकांनी त्यांना मारहाण केल्याचे म्हटले आहे. कुरियाचिरा यांनी त्रिशुर लोकसभा मतदार संघात कॉंग्रेस उमेदवाराच्या पराभवासाठी माजी खासदार टी.एन. प्रतापन आणि वल्लूर यांना जबाबदार ठरविले. मुरलीधरन यांच्या पराभवाने कॉंग्रेसच्या जिल्हा कमिटीत वाद निर्माण झाला आहे. बुधवारी जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या कार्यालयाहबाहेर पोस्टर चिकटविण्यात आले होते. या पोस्टरवर कॉंग्रेसच्या उमेदवाराच्या लाजीरवाण्या पराभवाबद्दल जिल्हा नेतृत्वावर टिका करण्यात आली होती. भाजपा नेते सुरेश गोपी यांनी मुरलीधन यांना हरवून त्रिशूर लोकसभा मतदार संघातून ऐतिहासिक विजय मिळविला आहे. त्यामुळे हा पराभव कॉंग्रेसच्या जिव्हारी लागला आहे.

पराभवाने राजकीय जीवनातून निवृत्ती

त्रिशूर लोकसभा मतदारसंघात विजय मिळवून भाजपने केरळमध्ये प्रथमच आपले खाते उघडले आहे. येथे भाजपचे सुरेश गोपी यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी कॉंग्रेसचे  उमेदवार सीपीएमचे व्हीएस सुनील कुमार यांचा 74,000 मतांनी पराभव केला आहे. काँग्रेसचे उमेदवार मुरलीधरन येथे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले आहेत. त्यांना एकूण 3,28,124 मते मिळाली. या पराभवानंतर काँग्रेस उमेदवाराने राजकीय जीवनातून निवृत्ती जाहीर केली आहे.