टीव्ही मालिकेचं क्रेझ सध्या कमी झालं आहे. मात्र टीव्हीच्या काही मालिकांमध्ये असलेल्या मनोरंजनाला तोड नाही. अशाच काही धमाकेदार मालिकांबद्दल काही गोष्टी जाणून घेऊयात.
साराभाई V / S साराभाई अशी एक सीरियल होती, ज्याची प्रेक्षकांनी प्रचंड प्रशंसा केली. आज प्रेक्षक टीव्हीवर ही सीरियल खूप मिस करतात. ही मालिका स्टार वनवर 2005 मध्ये सुरू झाली. ज्याला प्रेक्षकांनी खूप प्रेम दिलं.
देख भाई देख मधील शेखर सुमन हल्ली इंडस्ट्रीपासून लांब आहेत, मात्र त्यांचं काम पाहून लोकांनी त्यांना खूप प्रेम दिलं आहे. त्यांची भूमिका आणि मालिकेशी निगडित पात्रं प्रेक्षकांना चांगलीच आवडली. या शोमध्ये नवीन निश्चल, फरीदा जलाल, भावना बलसावर, देवेन भोजानी, सुषमा सेठ, विशाल सिंग आणि नताशा सिंग मुख्य भूमिकेत होते.
ऑफिस ऑफिसमधील पंकज कपूर यांना अस्वस्थ होताना पाहणं संपूर्ण भारताला आवडायचं. आयुष्याच्या प्रवासात मुसादीलाल यांना तितक्या समस्या आल्या. मात्र प्रेक्षक घरी तेवढंच हसायचे.
'बा बहू आणि बेबी' चं ठक्कर कुटुंब मनोरंजनची उत्तम मेजवानी होतं. हा एक उत्कृष्ट कार्यक्रम होता, अजूनही या कार्यक्रमात गट्टूची भूमिका बजावणारा अभिनेता देवेन भोजानीचं काम आठवतं. गट्टू किती निर्दोष आणि भोळा होता.
तू तू-मैं मैं या मालिकेवर प्रेक्षकांचं वेगळं प्रेम होतं.
एफआयआरमध्ये, कविता कौशिकनं चंद्रमुखी चौटालाच्या भूमिकेत उत्तम काम केलं होतं. अजूनही ही मालिका प्रेक्षकांच्या आठवणीत आहे.
शक्तीमानची शैली खूप खास होती. ज्यामुळे प्रेक्षकांनी त्याला अधिक पसंत केले.
हम पांच या मालिकेवर प्रेक्षकांचं खास प्रेम होतं.