पुणे अपघात प्रकरणाची चर्चा देशभरात होत असलेली पाहायला मिळत आहे. कल्याणीनगर येथे शनिवारी रात्री पबमध्ये पार्टी करून एका बड्या बिल्डरच्या मुलाने दोन तरूण-तरूणींना उडवलं होतं. हा अपघात इतका भीषण होती की धडकेमध्ये तरूण-तरूणी मृत्यूमुखी पडले. आरोपी अल्पवयीन असून बाल हक्क मंडळाने त्याची रवानगी बालसुधार गृहात केलीये. आता पोलीस या प्रकरणात पब मालक आणि मुलाचे वडील विशाल अग्रवाल यांची चौकशी करत आहेत. अशातच या प्रकरणावर आमदार बच्चू कडू यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
डान्सबार पब सारखे प्रकार बघितले तर त्यात जाणारा वर्ग प्रचंड पैसा असणारा वर्ग आहे. शौकीन लोक हे पैशाच्या माध्यमातून माणुसकी विसरली आहे. बंधन कशी येणार कारण अधिकारी आणि नेत्यांना त्याचं काहीच पडलं नाही. पैशाच्या भरोशावर लोकशाही घेतली जात असेल, मत खेचली जात असेल तर सामान्य माणसाच्या जीवनाला अनेक त्याच्या मरणाला काही अर्थ नाही. ज्याचे श्रम कमी त्याला पगार जास्त आणि ज्याचे श्रम जास्त त्याला पगार कमी आहे अशी परिस्थिती असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
या प्रकरणात पोलीस व्यवस्थेवरही बड्या बिल्डरचा मुलगा असल्याने प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचे आरोप झालेत. पुण्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी थेट पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पैसे खाल्याचा आरोप केला होता. मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस आयुक्तालयातूनच पत्रकार परिषद घेत या प्रकरणाची संपूर्ण माहिती दिली होती.
दरम्यान, आज शुक्रवारी कोर्टाने या प्रकरणातील सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणामुळे पोलीस खात्यामधील दोन कर्मचाऱ्यांचं निलंबन केलं आहे. राहुल जगदाळे आणि विश्वनाथ तोडकरी अशी निलंबित झालेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. अपघात झाल्यानंतर कंट्रोल रूम शी संपर्क नाही केला. तसेच नाईट राऊंडचे पोलीस उपायुक्त यांना माहिती न दिल्यामुळे पुणे पोलिसांची ही कारवाई केल्याचं सांगितलं आहे.