कल्याण पूर्व मतदारसंघावरून महाविकास आघाडीत बिघाडी का?. काँग्रेस कल्याण पूर्व मतदारसंघाबाबत आग्रही. ठाकरे गट सगळीकडे इच्छुक, मात्र त्यांच्याकडे उमेदवार नाही. ठाकरे गटावर उमेदवार आयात करायची वेळ, काँग्रेसकडे सक्षम उमेदवार. काँग्रेस पक्षाला एकटे लढण्याची वेळ आली तर ही जागा काँग्रेस लढवणार. काँग्रेस पदाधिकाऱ्याची ठाकरे गटावर सडकून टीका.
“लवकरात लवकर उमेदवार यादी जाहीर व्हावी अशी अपेक्षा. आज रात्री उशिरापर्यंत जागा वाटपाची चर्चा पूर्ण करु. महाविकास आघाडीत मतभेद नाहीत. नाना पटोले आजच्या बैठकीला उपस्थित असतील. चर्चेचा वेग कमी होता. आज दुपारी पुन्हा बैठक” असं संजय राऊत म्हणाले. “तिन्ही पक्षात फार मोठे मतभेद नाहीत. आघाडीच्या राजकरणात अशा एखाद दुसऱ्या जागेवरुन चर्चा वाढत असते” असं राऊत म्हणाले.
आमच्यात वाद नाही. ठाकरेंच्या भेटीनंतर चेन्नीथला यांचं वक्तव्य. महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढणार. ठाकरेंच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी माताोश्रीवर आलो होते असं काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी सांगितलं.
वसई-विरारमध्ये भाजपाच्या फोडाफोडीच्या राजकारणाला अपयश. बविआचे कार्याध्यक्ष तथा आमदार हितेंद्र ठाकूर यांचे आत्तेभाऊ राजीव पाटील यांची भाजपातील पक्षप्रेवेशातून माघार. पक्षांतर्गत कौटुंबिक वाद टाळण्यासाठी, राजीव पाटील यांची 89 वर्षाची आई, पक्षाचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर, बविआचे संघटक सचिव तथा राजीव पाटील यांचे छोटे भाऊ आजीव पाटील यांच्या मध्यस्थीला यश.
अमित शहा यांच्या सोबतच्या बैठकीनंतर अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया.. आम्ही तिघे एकत्र बसून जागा वाटपाचा निर्णय जाहीर करू… उमेदवारांचे नाव देखील एकत्र जाहीर करू
शहरातील एकवीरा देवीचे आणि पांझरा नदी किनारी असलेल्या अंजली शहा दर्ग्याचे घेणार दर्शन.. त्यानंतर सभेला संबोधित करणार…
संजय राऊत खरं बोलले , मात्र त्यांना उशीरा कळलं, नाना पटोलेवरील टिकेवर चव्हाण यांची प्रतिक्रिया… जरांगे पाटील यांचा निर्णय महाराष्ट्र हिताचा रहावा अशी आमची विनंती असं वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केलं आहे.
ठाकरे गटाची अवस्था काल महाराष्ट्राने पाहिली, ठाकरे गटाला काँग्रसने चांगलीच चपराक लगावली. तुटेपर्यंत ताणू नका हे सांगणं म्हणजे नामुष्कीच आहे, असा टोला संजय शिरसाट यांनी लगावला.
महायुतीत मुंबई शहरातील 36 जागांचा तिढा सुटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजप 18, शिंदे गट 16 तर अजित पवार 2 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे वृत्त आहे.
जळगाव ग्रामीणचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे इच्छुक उमेदवार माजी मंत्री गुलाबराव देवकर शरद पवारांच्या भेटीसाठी रात्री तातडीने विमानाने मुंबईत. जळगाव ग्रामीण मतदार संघात जागेवरून महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गट व राष्ट्रवादी शरद पवार गट या दोघांमध्ये रस्सीखेच सुरू आहे.
जळगाव ग्रामीण मतदार संघात जागा ही मशाल चिन्हावरच लढवली जावी यावर उद्धव ठाकरे ठाम आहेत.
ठाकरे गट-पवार गटात जागावाटपाबाबत कोणताही वाद नाही. काल दिवसभर आमची पवार गटाशी चर्चा झाली. आज रमेश चेन्निथला उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत असं संजय राऊन यांनी सांगितलं.
समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची आज 11 वाजता धुळ्यात जेल रोड येथे सभा होणार आहे.
सभेसाठी मोठा शामियाना घालण्यात आला असून हजारो खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. या सभेसाठी जिल्हाभरातून कार्यकर्ते उपस्थित राहणार.
इंडिया अलायन्स मधील घटक पक्ष असलेल्या समाजवादीचा धुळे शहर विधानसभेवर दावा असून अखिलेश यादव नेमकं काय बोलतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलं आहे.
पुण्याच्या खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीकडून चुकीचे उमेदवार दिल्यास तिसरा पर्याय देण्यात येणार आहे. खेड तालुक्यातील सर्व पक्षाचे प्रमुख नेत्यांचा एकत्र येत बैठकीत निर्णय घेण्यात आली.महाविकास आघाडी कडून अद्याप उमेदवारी जाहीर होणे अगोदरच सर्व पक्षीय नेत्यांनी हा निर्णय घेतला आहे. तालुक्याच्या हितासाठी गुन्हेगारी आणि वादविवाद थांबवण्यासाठी, तालुका चुकीच्या व्यक्तीच्या हातात जाऊ नये यासाठी सर्व पक्षीय नेत्यांचा तिसरा पर्याय देण्याचा विचार करण्यात आला आहे.
नाशिक जिल्ह्यात १५ लाख बहिणी लाडक्या… ९५ टक्के महिला मतदारांचे योजनेसाठी अर्ज केला आहे. ७९ हजार महिला ठरल्या योजनेसाठी अपात्र ठरल्यात ७ लाख ३८ हजार ५५६ महिलांनी अर्ज अॅपद्वारे केला आहे. तर ८ लाख ३५ हजार ८५३ अर्ज पोर्टलद्वारे जिल्ह्यात प्राप्त झालेत. जिल्ह्यात आतापर्यंत १५ लाख ७४ हजार ४०९ बहिणींचे अर्ज आले आहेत.
पुण्याच्या शिरूर तालुक्यात चिमुकल्यावर बिबट्याचा हल्ला केला आहे. शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. वंश राजकुमार सिंग मृत मुलाचे नाव आहे. रात्री उशिरा घरासमोरील ओट्यावरून या चिमुकल्याला बिबट्याने उसाच्या शेतात ओढून नेले यातच या चिमुकल्याचा मृत्यू झालाय. गेली काही दिवसापासून उत्तर पुणे जिल्ह्यात वाढत असलेल्या बिबट्याच्या हल्ल्यानी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. या बिबट्यांना जेरबंद करण्याचे मोठे आव्हान आता वनविभागा पुढे असणार आहे.
नाशिकमध्ये २५ नोव्हेंबर २०२४ मोर्चा – आंदोलनावर बंदी घालण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आंदोलन, मोर्चा, निदर्शनांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. जिल्हादंडाधिकारी जलज शर्मा यांनी तसे आदेश दिलेत. शासकीय, निमशासकीय कार्यालये, संस्था, शासकीय विश्रामगृह, सार्वजनिक ठिकाणे, रस्त्याच्या ठिकाणी आंदोलन करण्यास बंदी असमार आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडावी यासाठी मोर्चे आंदोलनावर निर्बंध आहेत. आदेशाचा भंग करणाऱ्या विरोधात कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. अशातच आता घडामोडींना वेग आला आहे. दिल्लीत काल रात्री भाजपचे वरिष्ठ नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत महायुतीची बैठक पार पडली. या बैठकीत जागावाटप निश्चित झाल्याचं बोललं जात आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार आजपासून विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराला सुरुवात करणार आहेत. महाविकास आघाडीचंही जागावाटप जवळपास झालं आहे. 48 जागांवर मात्र महाविकास आघाडीत रस्सीखेच पाहायला मिळतेय. विदर्भाच्या जागेसाठी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात रस्सीखेच सुरु आहे. याबाबतचे सर्व अपडेट्स तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे दिवसभर आमच्या ब्लॉगला फॉलो करा.