Mahayuti : अजित पवार वेळेत आले म्हणून तुमची लंगोटी तरी वाचली, शिंदे गटातील या बड्या नेत्याला अमोल मिटकरींचा टोला, महायुतीत धुसफूस वाढली

| Updated on: Jun 20, 2024 | 3:31 PM

Amol Mitkari : लोकसभा निकालानंतर महायुतीत धुसफूस वाढली आहे. त्यात अजित पवार गटाला टार्गेट करण्यात येत असल्याचे नेत्यांच्या वक्तव्यावरुन तरी समोर येत आहे. भाजप आणि शिंदेसेनेतूच दारुगोळा डागण्यात येत आहे.

Mahayuti : अजित पवार वेळेत आले म्हणून तुमची लंगोटी तरी वाचली, शिंदे गटातील या बड्या नेत्याला अमोल मिटकरींचा टोला, महायुतीत धुसफूस वाढली
अमोल मिटकरी यांचा शिंदेसेनेवर हल्लाबोल
Follow us on

लोकसभा निकालानंतर महायुतीत बेबनाव असल्याचे वृत्त खरे तर नाही ना? असे नेत्यांच्या वक्तव्यावरुन समोर येत आहे. गेल्या आठवडाभरापासून अजित पवार गटाला महायुतीत टार्गेट करण्यात येत असल्याचे नेत्यांचे वक्तव्य तपासल्यावर समजते. भाजप आणि शिंदेसेनेत अजित पवार गटाविषयी नाराजी असल्याचे बोलले जात आहे. अजित पवार गटाला सोबत घेतल्यानेच लोकसभेत पराभवाचा सामना करावा लागल्याचा आरोप काही भाजप आमदारांनी केल्याचे समजते. तर या आरोपांना अजित पवार गोटातून पण प्रत्युत्तर देण्यात येत आहे.

भाजप गोटातून हल्ला

हे सुद्धा वाचा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे इंग्रजी मुखपत्र द ऑर्गनायझरने पहिल्यांदा अजित पवार गटावर तोफ डागली होती. निकालानंतर लागलीच भाजपला कानपिचक्या देण्यात आल्या. अजित पवार गटाला सोबत घेतल्यानेच राज्यात भाजपचा पराभव झाला असे लेखात म्हटले होते. अजित पवारांना सोबत घेऊन भाजपने किंमत कमी केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर भाजपच्या बैठकीत सुद्धा काही आमदारांनी दादांना सोबत घेतल्याने नाराजीचा सूर आळवला होता.

रामदास कदम यांनी टाकला बॉम्ब

शिंदेसेना पण अजित पवारांना सोबत घेण्यावरुन नाराज असल्याचे बोलले जात होते. त्यातच रामदास कदम यांनी बॉम्ब टाकला. अजितदादा थोडे दिवस महायुतीत आले नसते तरी चाललं असतं, असा चिमटा कदमांनी काढला. त्यामुळे आता महायुतीत अजित पवार गटाविषयी धुसफूस वाढल्याचे समोर येत आहे. महायुतीतील वाद आता चव्हाट्यावर आला आहे.

तुमची लंगोटी तरी वाचली

अजित पवार गटावर वारंवार महायुतीतूनच एकाएक हल्ले वाढले आहेत. त्याला पवार गटातून पण प्रत्युत्तर देण्यात येत आहे. अमोल मिटकरी यांनी रामदास कदम यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. रामदास कदम, आपण जोरात बोललात .”मागून आलेले अजित दादा थोडे उशिरा आले असते तर बरं झालं असतं” माहितीसाठी सांगतो ते वेळेत आले म्हणून तुमची लंगोटी तरी वाचली, उशिरा आले असते तर हिमालयात जप करायला जावं लागलं असतं. दादांची कृपा म्हणून तुम्ही वाचलात हे विसरू नका.” असा खरमरीत टोला मिटकरी यांनी कदम यांना हाणला.