गुलाबी जॅकेट नाही तर गुजरातच्या गुलामगिरीची झुल; शरद पवारांच्या शिलेदाराचा अजितदादांवर हल्लाबोल

| Updated on: Oct 16, 2024 | 3:21 PM

Amol Kolhe on Ajit Pawar Pink Jacket : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गुलाबी जॅकेटवर शरद पवार गटाच्या नेत्याने टीका केली आहे. गुलाबी जॅकेट नाही तर गुजरातच्या गुलामगिरीची झुल असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसंच विधानसभा निवडणुकीवरही त्यांनी भाष्य केलं आहे. वाचा सविस्तर...

गुलाबी जॅकेट नाही तर गुजरातच्या गुलामगिरीची झुल; शरद पवारांच्या शिलेदाराचा अजितदादांवर हल्लाबोल
अजित पवार
Image Credit source: Facebook
Follow us on

सातारा जिल्ह्यातील वाईमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष गटाची शिवस्वराज्य यात्रा सुरु आहे. या मेळाव्याला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, मेहबूब शेख, बाळासाहेब पाटील उपस्थित आहेत. या मेळाव्यात शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी दमदार भाषण केलं. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला. ‘जनसन्मान यात्रे’वेळी अजित पवार गुलाबी जॅकेट घालतात. त्यावर अमोल कोल्हे यांनी टीका केली आहे. अजित दादांचं गुलाबी जॅकेट नाही तर गुजराती गुलामगिरीची झुल आहे, असं अमोल कोल्हे म्हणालेत.

अजित पवारांबाबत काय म्हणाले?

मला पूर्ण खात्री पटली आहे उशीर झाला. असला तरी आता तुमचे घड्याळाकडे लक्ष नाही. उमेदवार तगडा आहे म्हणून चालत नाही. सर्व एकजुट झाले तर निकाल वेगळा येईल. शर्ट चप्पल विकत घेऊ शकतो पण प्रथमच महाराष्टाने नेते विकत घेतले जात आहेत. अजित दादांचं गुलाबी जॅकेट नाही तर गुजराती गुलामगिरीची झुल आहे, असं अमोल कोल्हे म्हणालेत.

अमोल कोल्हेंचा महायुतीवर निशाणा

वाई परिसरात शिवप्रेमी आहेत. साडे तीनशे वर्ष किल्ले सिंधुदुर्ग टिकतो. मात्र छत्रपतीचा पुतळा टिकत नाही हे दुर्दैवी आहे. केंद्रीय मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना सुनावले या बाबत टेबल न्यूज म्हणुन सर्वत्र सांगितले जात आहे. आचारसंहितेच्या तोंडावर घोषणा देऊन चालत नाही, असं अमोल कोल्हे म्हणालेत. उठा उठा दिवाळी निवडणूक आली आणि गद्दारांना घरी पाठवण्याची वेळ झाली, असंही त्यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनीही या मेळाव्यात भाषण केलं. नेते कुठेही गेले तरी जनता शरद पवार यांच्यासोबत आहे. पक्ष फोडायची नाही तर पक्ष चोरायची पध्दत महाराष्ट्रात सुरु झाली आहे. सर्वच प्रकल्प गुजरातला न्यायचे असतील तर मते देखील गुजरातला मागा.. अजित दादांविषयी आपण कधीच बोलत नाही. पण जाणाऱ्यांचा एकच नारा तुरुंगा पेक्षा भाजप बरा आहे… अजित पवारांनी लाडकी बहिण योजनेवर बोलू नये. कारण दादांनी आपल्या बहिणीचा विचार केला नाही, अशा शब्दात मेहबूब शेख यांनी अजित पवारांवर टीका केली आहे.