अजितदादांना घेऊन भाजपची ब्रँड व्हॅल्यू कमी झाली का? शरद पवार एका वाक्यात म्हणाले…

| Updated on: Jun 15, 2024 | 3:53 PM

लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी आता तयारीला लागलेली दिसत आहे. महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली, यावेळी शरद पवार यांनी अजितदादा भाजपमध्ये गेल्यावर त्यांची ब्रँड व्हॅल्यू कमी झाली का असं विचारण्यात आलं, यावर पवारांनी काय उत्तर दिलं जाणून घ्या.

अजितदादांना घेऊन भाजपची ब्रँड व्हॅल्यू कमी झाली का? शरद पवार एका वाक्यात म्हणाले...
Follow us on

महायुतीमध्ये गेलेल्या अजित पवार यांची घुसमट होत असल्याची राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात होते. यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये एक जागा अजित पवार यांची आली होत. त्यामुळे महायुतीमध्ये अजित पवारांना सोबत घेतल्याचा फटका बसल्याचंही बोललं जातं. राष्ट्रवादीत असताना अजित पवारांचा दरारा होता तो कुठंतरी कमी झाल्यासारखं वाटतं. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेमध्ये शरद पवारांना अजितदादांना घेऊन भाजपची ब्रँड व्हॅल्यू कमी झाली का? असा सवाल केला गेला. यावर शरद पवार यांनी एका वाक्यात उत्तर दिलं.

शरद पवार काय म्हणाले?

साधी गोष्ट आहे. आमच्या लोकांच्या हातात सत्ता नाही. सत्ता कुणाच्या हातात आहे हे सांगायची गरज नाही. शेतकऱ्यांची परिस्थिती वाईट आहे. काही निर्णय घेतले असेल तर आनंद आहे. साधी गोष्ट आहे. कांदा व्यापारी आणि शेतकरी नाराज होता. तेवढ्यापुरतं मर्यादित नाही. राज्य आणि देशातील शेतकरी भाजपच्या विरोधात होता. त्यात काही बदल झालाय असं वाटत नाही असं म्हणत शरद पवारांनी भाजपवर निशाणा साधला. त्यानंतर अजितदादांना घेऊन भाजपची ब्रँड व्हॅल्यू कमी झाली का? असं विचारल्यावर त्यांचा अनुभव काय तो त्यांनी सांगितला. आम्ही का सांगावं, असं शरद पवार म्हणाले.

महाराष्ट्रातील जनतेने आमचा पराभव केला. त्याची कारणं अनेक आहेत. पण आम्ही बोलू इच्छित नाही, एवढच त्यांना सांगायचं आहे. जे काही स्टेटमेंट त्यांनी केलं. जुन्या काळातील. ते काढून आता बदनामी केली जाते. ती सत्तेचा गैरवापर आहे. काही लोकांनी बाबतीत यापूर्वी केसेस केल्या होत्या. त्यातील काही लोकांना जामीन दिला. काही लोक कारण नसताना आरोपात गेले. आजही तुरुंगात गेले, याचा अर्थ सरळसरळ सत्तेचा गैरवापर आहे. या सत्तेच्या गैरवापरातून लोकांनी भूमिका घेतली. ते शहाणपणा घेतील असं वाटलं होतं. पण त्यांनी शहाणपणा घेतला नाही. त्यामुळे तीन चार महिन्यात लोक विधानसभेत ठोस भूमिका घेतील, असंही शरद पवार म्हणाले.

मविआमध्ये मोठा भाऊ छोटा भाऊ नाही- चव्हाण

मोठा भाऊ छोटा भाऊ नाही. आम्ही एकत्र चर्चा केली आहे. प्राथमिक चर्चा झाली आहे. मागच्या विधानसभेचा आधार घेऊन जागा वाटप होईल. आमच्या कोणताही किंतू परंतु नाही, असं काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.