राज ठाकरेच मनसेचे सर्वेसर्वा, अध्यक्षपदी निवड; कधीपर्यंत अध्यक्षपदी राहणार?

| Updated on: Jun 13, 2024 | 5:49 PM

Raj Thackeray MNS President : राज ठाकरे यांची मनसे अध्यक्ष म्हणून एकमताने निवड झाली आहे. मनसे पक्षांतर्गत झालेल्या निवडणुकीमध्ये ठरावाला मंजुरी देत सर्वांनी एकमताने राज ठाकरे यांची निवड केली. ठराविक कालावधीपर्यंत कधीपर्यंत अध्यक्षपदी राहणार आहेत.

राज ठाकरेच मनसेचे सर्वेसर्वा, अध्यक्षपदी निवड; कधीपर्यंत अध्यक्षपदी राहणार?
Follow us on

मनसे पक्षाच्या अध्यक्षपदी राज ठाकरेंची निवड करण्यात आली आहे. मनसेची पक्षांतर्गत निवडणूक प्रक्रिया पार पडली असून त्यामध्ये एकमताने राज ठाकरेंची निवड झाली आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या नियमानुसार राज ठाकरेंची निवड झालीये. राज ठाकरे मनसे पक्षाचे 2023 पासून 2028 पर्यंत अध्यक्ष असणार आहेत. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी याबाबत माहिती दिली. राज ठाकरे यांची नेमणूक करावी असा ठराव बाळा नांदगावकर यांनी मांडला. तर मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी अनुमोदन दिले. या ठरावामध्ये एकमताने राज ठाकरे यांची निवडणूक आयोगाने दिलेल्या नियमांनुसार राज ठाकरे यांची निवड झाली आहे.

राज ठाकरे बैठकीत काय म्हणाले?

मविआला झालेलं मतदान मोदी विरोधातून झालेलं आहे. मविआच्या प्रेमातून झालेलं नाही. शिवसेना ठाकरे गटाला मराठी माणासाने अपेक्षेप्रमाणे मतदान केलेलं नाही. शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाचं नाव काढून घेतल्याचं लोकांना पटलं नाही. उद्धव ठाकरे यांच्या बाबतीतल्या राजकारणात बाळासाहेबांना आणू नका, असं अमित शहांना सांगितलं. बाळासाहेबांना मानणारा मोठा वर्ग आजही महाराष्ट्रात आहे. हे देखील अमित शहांना सांगितलं. आपण विधानसभेच्या २०० ते २२५ जागा लढवत आहोत, असं राज ठाकरे बैठकीत म्हणाले.

मनसे स्वबळावर

आमचं कोणासोबतही बोलणं सुरू नाही. आतापर्यंत आम्ही स्वबळावर निवडणुका लढवल्या आहेत. पुढे काय होतं ते माहित नाही पण आम्ही आमची तयारी करत असल्याचं बाळा नांदगावकर म्हणाले. यंदाच्या लोकसभा निवडणुकीनमध्ये मनसे पक्षाने महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. राज ठाकरे यांनी पुण्यात मुरलीधर मोहोळ, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे, ठाण्यात नरेश म्हस्केंसाठी सभा घेतली होती. आता विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेचा भूमिका काय असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

२०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मनसे पक्षाला यश मिळालं नाही. मनसे पक्षाची फक्त एक जागा निवडून आली होती. कल्याण ग्रामीणमधू राजू पाटील विजयी झाले होते. यंदा राज ठाकरेंच्या पक्षाच्या  किती जागा येतात? त्यांची भूमिका काय असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.